शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

नव्वदी पार करणाऱ्यांची संख्या मोठी

By admin | Updated: May 30, 2017 02:58 IST

आयसीएसई बोर्डाच्या (दहावी) व आयएससी (बारावी) परीक्षेच्या निकालामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आयसीएसई बोर्डाच्या (दहावी) व आयएससी (बारावी) परीक्षेच्या निकालामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे निकालावरून दिसून येत आहे. आयसीएसईमध्ये देशात पहिल्या आलेल्या मुस्कान पठाण हिने १०० पैकी ९९.४० टक्के गुण मिळविले, तर ९९ टक्के गुण मिळविणारा राघव सिंघल तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे एक-एक गुणांवरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा झाल्याचे दिसून येत आहे. द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड (आयसीएसई) आणि इंडियन स्कूल सर्टिफिकेट (आयएससी) बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल सोमवारी जाहीर झाले. आयसीएसई व आयएससी बोर्डाच्या शाळांची संख्या ही अत्यंत मर्यादित आहे. या बोर्डांचा अभ्यासक्रम हा अत्यंत कठीण समजला जातो. मात्र तरीही अनेक विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवित यश संपादन केले आहे.सेंट मेरी स्कूलच्या १९९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १४९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४३ इतकी आहे. विद्या प्रतिष्ठान मरगपट्टा सिटीच्या ९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४५ इतकी आहे. ब्ल्यू रिचच्या २५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्या सर्वांनी चांगले यश मिळविले आहे. बिशप स्कूलच्या कॅम्प शाळेतील २३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी ७१ जणांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. बिशपच्या कल्याणीनगर शाळेतील ३१५ जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी १०७ जणांनी ९० पेक्षा जास्त गुण मिळविले. उंड्री येथे २०८ जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी ६६ जणांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.आयएससी (बारावी) परीक्षेमध्ये हचिंग्स कॉलेजच्या श्रीतन वर्मा याने कॉमर्समधून ९०.२५ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला. सायन्स शाखेमधून सिद्धेश कुडले याने ८४ टक्के मिळवित पहिला क्रमांक पटकाविला. बिशप स्कूलच्या चैतन्य दोषीने ९७.५ टक्के, मुकुल महाडिकने ९६.७५ टक्के, अमानतुल्ला नाशिकवाला हिने ९६.५ टक्के गुण मिळविले.विद्यार्थ्यांमध्ये एका-एका गुणावरून मोठी स्पर्धा झाल्याचे दिसून येत आहे. मुस्कानसह बंगळुरूच्या सेंट पॉल इंग्लिश स्कूलमधील आश्विनी राव हिलादेखील ९९.४ टक्के गुण मिळाले असून दोघी संयुक्तपणे देशातून पहिल्या आल्या आहेत.निहाल रहेजाने मिळविले ६६ टक्केल्ल बिशप स्कूलमधील निहाल रहेजा या अंध विद्यार्थ्याने ६६ टक्के गुण मिळविले आहेत. अडचणींवर मात करून रहेजा याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे शाळेतील शिक्षकांकडून कौतुक करण्यात आले.