शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नव्वदी पार करणाऱ्यांची संख्या मोठी

By admin | Updated: May 30, 2017 02:58 IST

आयसीएसई बोर्डाच्या (दहावी) व आयएससी (बारावी) परीक्षेच्या निकालामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आयसीएसई बोर्डाच्या (दहावी) व आयएससी (बारावी) परीक्षेच्या निकालामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे निकालावरून दिसून येत आहे. आयसीएसईमध्ये देशात पहिल्या आलेल्या मुस्कान पठाण हिने १०० पैकी ९९.४० टक्के गुण मिळविले, तर ९९ टक्के गुण मिळविणारा राघव सिंघल तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे एक-एक गुणांवरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा झाल्याचे दिसून येत आहे. द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड (आयसीएसई) आणि इंडियन स्कूल सर्टिफिकेट (आयएससी) बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल सोमवारी जाहीर झाले. आयसीएसई व आयएससी बोर्डाच्या शाळांची संख्या ही अत्यंत मर्यादित आहे. या बोर्डांचा अभ्यासक्रम हा अत्यंत कठीण समजला जातो. मात्र तरीही अनेक विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवित यश संपादन केले आहे.सेंट मेरी स्कूलच्या १९९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १४९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४३ इतकी आहे. विद्या प्रतिष्ठान मरगपट्टा सिटीच्या ९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४५ इतकी आहे. ब्ल्यू रिचच्या २५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्या सर्वांनी चांगले यश मिळविले आहे. बिशप स्कूलच्या कॅम्प शाळेतील २३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी ७१ जणांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. बिशपच्या कल्याणीनगर शाळेतील ३१५ जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी १०७ जणांनी ९० पेक्षा जास्त गुण मिळविले. उंड्री येथे २०८ जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी ६६ जणांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.आयएससी (बारावी) परीक्षेमध्ये हचिंग्स कॉलेजच्या श्रीतन वर्मा याने कॉमर्समधून ९०.२५ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला. सायन्स शाखेमधून सिद्धेश कुडले याने ८४ टक्के मिळवित पहिला क्रमांक पटकाविला. बिशप स्कूलच्या चैतन्य दोषीने ९७.५ टक्के, मुकुल महाडिकने ९६.७५ टक्के, अमानतुल्ला नाशिकवाला हिने ९६.५ टक्के गुण मिळविले.विद्यार्थ्यांमध्ये एका-एका गुणावरून मोठी स्पर्धा झाल्याचे दिसून येत आहे. मुस्कानसह बंगळुरूच्या सेंट पॉल इंग्लिश स्कूलमधील आश्विनी राव हिलादेखील ९९.४ टक्के गुण मिळाले असून दोघी संयुक्तपणे देशातून पहिल्या आल्या आहेत.निहाल रहेजाने मिळविले ६६ टक्केल्ल बिशप स्कूलमधील निहाल रहेजा या अंध विद्यार्थ्याने ६६ टक्के गुण मिळविले आहेत. अडचणींवर मात करून रहेजा याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे शाळेतील शिक्षकांकडून कौतुक करण्यात आले.