शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचीही आता चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:57 IST

कांद्याला सोन्याचा भाव आल्याने तो चक्क चोरी होऊ लागला आहे. साकोरे (ता. आंबेगाव) येथील दोन शेतकºयांच्या बराकीतील कांदा रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.

मंचर : कांद्याला सोन्याचा भाव आल्याने तो चक्क चोरी होऊ लागला आहे. साकोरे (ता. आंबेगाव) येथील दोन शेतकºयांच्या बराकीतील कांदा रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. दोघांच्या बराकीतील ३१ गोण्या चोरून नेल्या आहे. या कांद्याची किंमत ४२ हजार रुपये एवढी आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.सासू आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी गाडे पत्नीसह निरगुडसर येथे गेले होते. रात्री उशिरा घरी आल्यावर दोघे जेवण करून झोपी गेले. सकाळी ६.३० वाजता पत्नी सुमन गाडे उठून चालण्यासाठी रस्त्यावर गेले होते. त्या वेळेस रस्त्याच्या कडेला गाडे यांच्या कांद्याच्या बराकीच्या बाहेर दोन कांद्याच्या गोण्या भरलेल्या पडलेल्या होत्या. सुमन गाडे, तसेच तुळशीराम गाडे व त्यांचा मुलगा सुरेश बराकीजवळ गेले असता बराकीतील २५ गोणी कांदा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. शेतकरी गाडे यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र त्यांना चोरी झालेला कांदा आढळला नाही. यासंदर्भात तुळशीराम रामजी गाडे यांनी अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपये किमतीचा २५ पिशवी कांदा चोरून नेल्याची फिर्याद मंचर पोलिसांत दिली. पोलिसांनी या कांदाचोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.दुसºया एका घटनेत साकोरे येथील बबन नामदेव लोहाटे यांच्या ५० किलो वजनाच्या ६ गोणी कांदा अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. लोहाटे यांनी दिवसभर कांद्याच्या बराकीतील कांदा गोणीमध्ये भरून तो बराकीच्या बाहेर ठेवला होता. सायंकाळी ६ वाजता ते घरी गेले. सकाळी बबन लोहाटे यांना बंडू तुळशीराम गाडे यांनी बराकीच्या समोर ठेवलेल्या कांद्याच्या पिशव्या कोणीतरी चोरून नेल्याची कल्पना दिली. लोहाटे शेतात गेले असता ७ हजार रुपये किमतीच्या ६ गोण्या कांद्याच्या पिशव्या चोरीला गेल्याचे आढळले. बबन लोहाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंचर पोलिसांत अज्ञात कांदाचोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.सध्या कांद्याचे बाजारभाव कडाडले आहेत. त्यामुळे कांद्याला चांगलाच भाव आला आहे. किरकोळ बाजारातसुद्धा कांदा चांगल्या दराने विकला जातोय. कांद्याला सोन्याचा भाव आल्याने शेतकरी आता कांदापिकाची विशेष काळजी घेत आहे. साकोरे येथील शेतकरी तुळशीराम रामजी गाडे यांनी त्यांच्या शेतातील कांदा बराकीत साठवून ठेवला होता. कांद्याचे भाव अजून वाढल्यावर तो विक्रीसाठी शेतकरी गाडे नेणार होते. या कांद्याचे चांगले पैसे त्यांना मिळणार होते.