शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आता पावसाच्या ‘कमबॅक’ची गरज!

By admin | Updated: July 29, 2016 03:54 IST

जून व जुलै महिन्याची सरासरी ओलांडून गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली आहे. या काळात पेरण्यांनी वेग घेऊन आता पिकांची उगवण झाली असून, पावसाच्या

पुणे / मंचर : जून व जुलै महिन्याची सरासरी ओलांडून गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली आहे. या काळात पेरण्यांनी वेग घेऊन आता पिकांची उगवण झाली असून, पावसाच्या ‘कमबॅक’कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आतापर्यंत ४५३.७ मिमी पाऊस झाला आहे. मध्यंतरी पडलेला दमदार पाऊस खरीप हंगामासाठी फायदेशीर ठरला व त्यानंतर कामे मार्गी लागली. चांगला पाऊस पडल्याने पाणीसाठा बऱ्यापैकी जमा झाला. त्या वेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. खरिपातील नगदी पिकांसाठीसुद्धा हा पाऊस फायदेशीर ठरला गेला. चांगल्या पावसाने पिके तरारली गेली. त्यानंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली.नगदी पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पावसाची सध्या नितांत आवश्यकता आहे. खरिपातील पिकांची उगवण होत असून, त्यासाठी पाऊस पडला पाहिजे. सध्या आकाश अंधारून येते; मात्र दमदार पाऊस पडताना दिसत नाही. रिमझिम पाऊस सध्या पुरेशा प्रमाणात पडत नसून दिवसभर कडक ऊन पसरलेले असते. पावसाने पुन्हा कमबॅक केले तर धरणांतील साठा वाढण्यास मदत होईल. पाऊस अजून लांबला तर मात्र पिकांना त्याचा फटका बसेल. (प्रतिनिधी)