शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कामे रखडल्यास आता ५ हजारांचा दंड, जिल्हा परिषदेतील यंत्रणांचा वेग वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 03:52 IST

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामांचा वेग वाढविण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणे वेगाने निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेत सेवा हक्क अधिनियमनांतर्गत कामे करण्यावर भर देण्यात येईल.

निनाद देशमुख पुणे : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामांचा वेग वाढविण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणे वेगाने निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेत सेवा हक्क अधिनियमनांतर्गत कामे करण्यावर भर देण्यात येईल. कुठलेही प्रकरण पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी राहणार असून, त्यापुढे कामाला विलंब झाल्यास त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना दररोज ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. मे महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या विभागांमधील अनेक कामे प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांना वेळेत सुविधा मिळत नाहीत. त्यांची प्रकरणे मंजूर न झाल्याने नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. तसेच, विविध योजनांसाठी नागरिक जिल्हा परिषदेत अर्ज मंजूर करीत असतात. त्यांना त्याविषयी पूर्ण माहिती नसल्याने काही कागदपत्रांअभावी त्यांची प्रकरणे नामंजूर केली जातात. काही अर्जांमध्ये दुरुस्ती सुचवली जात असल्याने ती प्रकरणेसुद्धा मागे ठेवली जात असल्यामुळे नागरिकांना योग्य सेवा मिळत नाही. काही वेळा लाचेची मागणी केली जात असल्यानेही कामे होत नाहीत. यामुळे यापुढे जिल्हा परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक आणि सुरळीत करण्यासाठी सेवा हक्क अधिनियमनांतर्गत कामे करण्यावर भर देण्यात येईल. त्यानुसार प्रत्येक विभागाला वेळापत्रक दिले जाणार आहे. कुठलीही प्रकरणे विभागात आल्यावर ती पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल. तसेच, त्यासाठी लागणारी कागदपत्रे योग्य आहेत का? याची माहिती संबंधितांना आधीच दिली जाणार आहे. यानंतर अर्जदारांनी तसेच तक्रारदारांची कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना १५ दिवसांची मुदत देतील. या मुदतीत ही कामे न झाल्यास त्यासाठी जबाबदार असणाºयाला काम पूर्ण होईपर्यंत दररोज ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. यासाठी वेगळी यंत्रणा मे महिन्यापासून लागू करण्यात येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.मॉनिटर पथक ठेवणार वॉचजिल्हा परिषदेच्या सर्व विभागांत नागरिकांना योग्य सेवा मिळते की नाही, याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र मॉनिटर पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक सर्व विभागांवर वॉच ठेवेल.विभागात रोज कीती प्रकरणे आली? ती पूर्ण करण्याचा कालावाधी किती राहणार? तसेच ती कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण झाली की नाही? याची सर्व माहिती हे पथक ठेवेल. कामाला विलंब लावणाºयांना पथक जाब विचारणार असून, संबंधितांना उशीर झाल्यास दंड ठोठावला जाईल.