शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
4
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
5
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
6
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
7
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
8
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
9
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
10
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
11
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
12
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
13
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
14
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
15
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
16
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
17
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
18
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
19
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
20
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...

कामे रखडल्यास आता ५ हजारांचा दंड, जिल्हा परिषदेतील यंत्रणांचा वेग वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 03:52 IST

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामांचा वेग वाढविण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणे वेगाने निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेत सेवा हक्क अधिनियमनांतर्गत कामे करण्यावर भर देण्यात येईल.

निनाद देशमुख पुणे : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामांचा वेग वाढविण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणे वेगाने निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेत सेवा हक्क अधिनियमनांतर्गत कामे करण्यावर भर देण्यात येईल. कुठलेही प्रकरण पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी राहणार असून, त्यापुढे कामाला विलंब झाल्यास त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना दररोज ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. मे महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या विभागांमधील अनेक कामे प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांना वेळेत सुविधा मिळत नाहीत. त्यांची प्रकरणे मंजूर न झाल्याने नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. तसेच, विविध योजनांसाठी नागरिक जिल्हा परिषदेत अर्ज मंजूर करीत असतात. त्यांना त्याविषयी पूर्ण माहिती नसल्याने काही कागदपत्रांअभावी त्यांची प्रकरणे नामंजूर केली जातात. काही अर्जांमध्ये दुरुस्ती सुचवली जात असल्याने ती प्रकरणेसुद्धा मागे ठेवली जात असल्यामुळे नागरिकांना योग्य सेवा मिळत नाही. काही वेळा लाचेची मागणी केली जात असल्यानेही कामे होत नाहीत. यामुळे यापुढे जिल्हा परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक आणि सुरळीत करण्यासाठी सेवा हक्क अधिनियमनांतर्गत कामे करण्यावर भर देण्यात येईल. त्यानुसार प्रत्येक विभागाला वेळापत्रक दिले जाणार आहे. कुठलीही प्रकरणे विभागात आल्यावर ती पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल. तसेच, त्यासाठी लागणारी कागदपत्रे योग्य आहेत का? याची माहिती संबंधितांना आधीच दिली जाणार आहे. यानंतर अर्जदारांनी तसेच तक्रारदारांची कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना १५ दिवसांची मुदत देतील. या मुदतीत ही कामे न झाल्यास त्यासाठी जबाबदार असणाºयाला काम पूर्ण होईपर्यंत दररोज ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. यासाठी वेगळी यंत्रणा मे महिन्यापासून लागू करण्यात येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.मॉनिटर पथक ठेवणार वॉचजिल्हा परिषदेच्या सर्व विभागांत नागरिकांना योग्य सेवा मिळते की नाही, याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र मॉनिटर पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक सर्व विभागांवर वॉच ठेवेल.विभागात रोज कीती प्रकरणे आली? ती पूर्ण करण्याचा कालावाधी किती राहणार? तसेच ती कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण झाली की नाही? याची सर्व माहिती हे पथक ठेवेल. कामाला विलंब लावणाºयांना पथक जाब विचारणार असून, संबंधितांना उशीर झाल्यास दंड ठोठावला जाईल.