शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

आता अभिजात भाषेचा लढा केंद्रपातळीवर

By admin | Updated: May 7, 2017 02:42 IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने व्यापक लोकचळवळ उभी करण्यात आली आहे. भिलार येथे

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने व्यापक लोकचळवळ उभी करण्यात आली आहे. भिलार येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. अभिजात भाषेच्या दर्जाची याचिका उच्च न्यायालयात निकाली निघाल्यानंतर आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. साहित्य महामंडळासह सर्व साहित्य संस्थांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि सातारा शाखेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. ही चळवळ केवळ साहित्य संस्थांपुरती मर्यादित न राहता व्यापक लोकचळवळ व्हावी, या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात आपण स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यक्तिश: पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती जोशी यांनी दिली.मसाप, शाहूपुरी शाखेच्या वतीने पंतप्रधान कार्यालयाला पत्रे पाठविण्यात आली आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन कार्यवाहीबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला कळवले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अवर सचिव कंवरजित सिंग यांनीही पत्र पाठवले असून त्यात मद्रास उच्च न्यायालयात याबाबत असलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे. त्यामुळे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कार्यवाही सुरू केल्याचे कळवले आहे. आता मुख्यमंत्र्यांनी निवेदनाची दखल घेऊन हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेची नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. २८ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत पुण्यातील मान्यवर लेखक, साहित्यिकही सहभागी झाले होते. या वेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले. अभिजात भाषेच्या दर्जाची चळवळ ही लोकचळवळ होण्याच्या उद्देशाने चर्चा करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, प्रौढ व्यक्ती, राजकारणातील व्यक्ती यांचाही समावेश असणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने प्रक्रिया करण्यात आली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली. इतर प्रादेशिक भाषांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळवताना पत्रांचा अक्षरश: पाऊस पाडला होता. मराठी भाषेसाठीही अशाच प्रकारे पत्रांची मोहीम हाती घेण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १४ जिल्ह्यांमधील शाखांनी पत्रांसाठी पुढाकार घेतला. एकट्या सातारा शाखेने ७०,००० पत्रे गोळा केली. सर्व शाखांनी मिळून १ लाख पत्रांची मोहीम यशस्वी केली. या सर्व प्रक्र्रियेमध्ये मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, मुंबई साहित्य संघ यांच्याकडून क्रियाशील पाठिंबा मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अभिजात भाषेच्या दर्जाची याचिका न्यायप्रविष्ट असल्याचे कारण इतके दिवस पुढे केले जात होते. आता ही याचिका निकाली निघाल्यामुळे या प्रक्रियेमधील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आता, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. आमदार, खासदार स्वत:च्या मानधनासाठी अल्पावधीत ठराव समंत करून घेऊ शकतात. मग, साहित्य, संस्कृतीशी संबंधित निर्णयाला एवढा विलंब का लागतो, तेच कळत नाही. भाषेचा प्रश्न प्रलंबित राहू न देण्याच्या दृष्टीने ही चळवळ अखंड सुरूच राहणार आहे. साहित्य महामंडळानेही या चळवळीला पाठिंबा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, याबाबत कोणाचेच दुमत नाही. शिखर संस्था असल्याने महामंडळावर काही मर्यादा येत असल्याने घटक संस्थांनी या चळवळीमध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. याबाबत पंतप्रधानांसह सर्व खासदार, तसेच सभापतींना पत्र लिहिले जाणार आहे.