शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

आता अभिजात भाषेचा लढा केंद्रपातळीवर

By admin | Updated: May 7, 2017 02:42 IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने व्यापक लोकचळवळ उभी करण्यात आली आहे. भिलार येथे

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने व्यापक लोकचळवळ उभी करण्यात आली आहे. भिलार येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. अभिजात भाषेच्या दर्जाची याचिका उच्च न्यायालयात निकाली निघाल्यानंतर आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. साहित्य महामंडळासह सर्व साहित्य संस्थांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि सातारा शाखेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. ही चळवळ केवळ साहित्य संस्थांपुरती मर्यादित न राहता व्यापक लोकचळवळ व्हावी, या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात आपण स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यक्तिश: पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती जोशी यांनी दिली.मसाप, शाहूपुरी शाखेच्या वतीने पंतप्रधान कार्यालयाला पत्रे पाठविण्यात आली आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन कार्यवाहीबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला कळवले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अवर सचिव कंवरजित सिंग यांनीही पत्र पाठवले असून त्यात मद्रास उच्च न्यायालयात याबाबत असलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे. त्यामुळे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कार्यवाही सुरू केल्याचे कळवले आहे. आता मुख्यमंत्र्यांनी निवेदनाची दखल घेऊन हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेची नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. २८ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत पुण्यातील मान्यवर लेखक, साहित्यिकही सहभागी झाले होते. या वेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले. अभिजात भाषेच्या दर्जाची चळवळ ही लोकचळवळ होण्याच्या उद्देशाने चर्चा करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, प्रौढ व्यक्ती, राजकारणातील व्यक्ती यांचाही समावेश असणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने प्रक्रिया करण्यात आली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली. इतर प्रादेशिक भाषांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळवताना पत्रांचा अक्षरश: पाऊस पाडला होता. मराठी भाषेसाठीही अशाच प्रकारे पत्रांची मोहीम हाती घेण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १४ जिल्ह्यांमधील शाखांनी पत्रांसाठी पुढाकार घेतला. एकट्या सातारा शाखेने ७०,००० पत्रे गोळा केली. सर्व शाखांनी मिळून १ लाख पत्रांची मोहीम यशस्वी केली. या सर्व प्रक्र्रियेमध्ये मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, मुंबई साहित्य संघ यांच्याकडून क्रियाशील पाठिंबा मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अभिजात भाषेच्या दर्जाची याचिका न्यायप्रविष्ट असल्याचे कारण इतके दिवस पुढे केले जात होते. आता ही याचिका निकाली निघाल्यामुळे या प्रक्रियेमधील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आता, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. आमदार, खासदार स्वत:च्या मानधनासाठी अल्पावधीत ठराव समंत करून घेऊ शकतात. मग, साहित्य, संस्कृतीशी संबंधित निर्णयाला एवढा विलंब का लागतो, तेच कळत नाही. भाषेचा प्रश्न प्रलंबित राहू न देण्याच्या दृष्टीने ही चळवळ अखंड सुरूच राहणार आहे. साहित्य महामंडळानेही या चळवळीला पाठिंबा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, याबाबत कोणाचेच दुमत नाही. शिखर संस्था असल्याने महामंडळावर काही मर्यादा येत असल्याने घटक संस्थांनी या चळवळीमध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. याबाबत पंतप्रधानांसह सर्व खासदार, तसेच सभापतींना पत्र लिहिले जाणार आहे.