शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

काँग्रेसमधील वादांना आता जाहीर स्वरूप

By admin | Updated: July 5, 2017 03:26 IST

महापालिकेतील दारुण पराभवानंतरही काँग्रेसच्या शहरातील नेते, पदाधिकाऱ्यांत शहाणपण आलेले दिसत नाही. अवघे ९ नगरसेवक

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेतील दारुण पराभवानंतरही काँग्रेसच्या शहरातील नेते, पदाधिकाऱ्यांत शहाणपण आलेले दिसत नाही. अवघे ९ नगरसेवक (१ स्वीकृत) असूनही त्यांच्यातसुद्धा एकवाक्यता दिसायला तयार नाही, तर शहर शाखेतील अनेक गटांनी आता उघडपणे आपले अस्तित्व दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. या सगळ्यामागे सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी मिळवण्याची स्पर्धा असल्याचे दिसते आहे.काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस दिग्विजयसिंह मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये आले होते. त्या वेळी ही बाब प्रकर्षाने उघड झाली. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असलेले  अभय छाजेड, सचिव असलेले  संजय बालगुडे, आमदार अनंत गाडगीळ व अन्य काही पदाधिकारी  या वेळी अनुपस्थित होते.  शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक आबा बागुल, उल्हास पवार, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे आदींची उपस्थिती होती. या दोन गटांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्त स्पर्धाच सुरू आहे. त्यातून कार्यकर्त्यांची परवड होत असून, पक्षाचीही हानी होत आहे. फक्त ९ नगरसेवक असताना आता महापालिकेतही उघडपणे दोन गट पडले आहे. त्यातील एका गटाचे अरविंद शिंदे तर दुसऱ्या गटाचे आबा बागुल नेतृत्व करीत आहे. २९ नगरसेवकांचा पक्ष ९ नगरसेवकांवर आणूनही शिंदे यांना गटनेतेपदाची बक्षिसी का दिली, असा बागुल गटाचा सवाल आहे तर पक्षासाठी आतापर्यंत काय केले ते सांगा, सगळी पदे मिळवून झाल्यानंतरही फक्त स्वत:साठीच काम होत असेल तर पक्षाने काय करायचे, असा प्रश्न शिंदे गटाकडून विचारला जात असतो. त्यातूनच शिंदे यांनी मध्यंतरी बागुल यांना महापालिकेतील अनुपस्थितीबद्दल नोटीस बजावली. त्याला उत्तर देताना बागुल यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडेच तक्रारी केल्या. काँग्रेसच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची नेत्यांच्या या स्पर्धेत चांगलीच ससेहोलपट होत आहे. कोणाकडे जावे तर लगेचच त्याच्या नावाचा शिक्का पडतो व दुसऱ्या गटातून हकालपट्टी केली जाते. पक्षाचे काम समजून काँग्रेस भवनमध्ये जावे तर नेत्यांकडून आमच्याकडे या म्हणून ओढाताण केली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादातच या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे नुकसान झाले असल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आमदार गाडगीळ तसेच बालगुडे, छाजेड आदींनी महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याचा मुद्दा उचलून धरला. काँग्रेसने या गावांचा समावेश करावा असा आग्रह धरला असतानाही या सर्वांनी ३४ गावांचा समावेश न करता तिथे स्वतंत्र महापालिका करावी, अशी भूमिका घेत त्यासाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर एक दिवसाचे उपोषण केले. त्याला शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठ दाखवली. पक्षाशी विसंगत असलेल्या भूमिकेबरोबर कसे सहमत होणार, असे बागवे यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी जाहीरपणे या सगळ्याची बेशिस्त अशा संभावना केली. आता बालगुडे यांच्या गोटात बागवे यांनी शह कसा द्यायचा याची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरता येईल याची चर्चा सुरू आहे.