शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

आता लक्ष मतमोजणीकडे

By admin | Updated: October 16, 2014 06:08 IST

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारराजाने मोठ्या संख्येने बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून विविध मतदान केंद्रात मतदारांनी रांगा लावून मतदान केले

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारराजाने मोठ्या संख्येने बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून विविध मतदान केंद्रात मतदारांनी रांगा लावून मतदान केले. भर उन्हात देखील मतदारांचा उत्साह कायम होता. जिल्ह्यात सरासरी ६२.५ टक्के मतदान झाले असून, गेल्या निवडणुकीपेक्षा त्यात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता रविवारी (दि. १५) होणाऱ्या मत मोजणीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. जिल्ह्यातील २१ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली असून, ३०८ उमेदवारांचे भवितव्य त्यावर ठरणार आहे. वाढलेले मतदान नक्की प्रस्थापितांच्या विरोधात जाणार की, अन्य काही पर्याय समोर येतात याबाबत आता खल सुरु झाला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा या यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. मतदारांनी देखील तितक्याच उत्साहाने अपले कर्तव्य बजावत भरगोस मतदान केले. बहुतांश मतदारसंघात पंचरंगी लढत असल्याने मतांचे धु्रवीकरण होऊन धक्कादयक निकाल हाती येतील असे भाकीत वर्तविण्यात येत होते. तसेच लढती देखील चुरशीच्या होतील असा अंदाज होता. मात्र मतदारांनी पुन्हा एकदा चकवा देत निकालाच्या अंदाजाचा पुर्नविचार करण्यास भाग पाडले आहे. गेल्या २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत २१ मतदारसंघाची टक्केवारी ५४.४४ टक्के होती. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ५७.४२ टक्के होती. रात्री उशीरा हाती आलेल्या प्राथमिक आकडेवारी नुसार जिल्ह्यात ६२.५० टक्के मतदान झाले होते. (प्रतिनिधी)