शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

मूठमातीकडून आता अग्निसंस्कारांकडे...

By admin | Updated: March 30, 2017 00:18 IST

सांसद आदर्श ग्राम गुळुंचे (ता. पुरंदर) येथे यापूर्वी भटके जीवन जगणाऱ्या; मात्र अनेक वर्षांपासून गुळुंचे गावात

नीरा : सांसद आदर्श ग्राम गुळुंचे (ता. पुरंदर) येथे यापूर्वी भटके जीवन जगणाऱ्या; मात्र अनेक वर्षांपासून गुळुंचे गावात वास्तव्यास असणाऱ्या देऊळवाले समाजात कायमच्या भटकंतीमुळे मृत्यूनंतर मूठमाती देण्याची प्रथा होती. परंतु या समाजातील एका महिलेच्या निधनानंतर मृतदेहावर अग्निसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला.तुकाई टेकडीच्या खाली देऊळवाले समाजातील लोकांची वस्ती आहे. त्यांची पाच ते सहा घरे आहेत. येथील पूनम शंकर निंबाळकर (वय २५) या महिलेचे निधन झाले. हा समाज आजवर भटके जीवन जगत आला आहे. भटकंती दरम्यान एखाद्याचे निधन झाल्यास त्याच्या मृतदेहाला मूठमाती दिली जाई. आता मात्र स्थिर जीवन जगत असल्याने मृतदेहाला अग्निसंस्कार देणे अधिक योग्य आहे, असा निर्णय समाजातील ज्येष्ठांनी घेतला. मात्र गावात अग्नीसंस्कार करून देण्यास काहींचा विरोध होता. सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी या कुटुंबांना धीर दिला व गावच्या सरपंच रत्नमाला जगताप यांचे पती व सांसद आदर्श ग्राम समित्यांचे समन्वयक सुरेश जगताप यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. जगताप यांनी देऊळवाले समाजातील नागरिकांच्या भूमिकेला पाठबळ दिले.आजही गावाबाहेरच..अनेक वर्षांपासून ही कुटुंबे गावाबाहेर उघड्यावर संसार थाटून आपली उपजीविका करत आहेत. शिधापत्रिका, मतदानकार्ड असूनही आजही या लोकांना गावाचे रहिवासी ठरविण्यात येत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.