शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

मूठमातीकडून आता अग्निसंस्कारांकडे...

By admin | Updated: March 30, 2017 00:18 IST

सांसद आदर्श ग्राम गुळुंचे (ता. पुरंदर) येथे यापूर्वी भटके जीवन जगणाऱ्या; मात्र अनेक वर्षांपासून गुळुंचे गावात

नीरा : सांसद आदर्श ग्राम गुळुंचे (ता. पुरंदर) येथे यापूर्वी भटके जीवन जगणाऱ्या; मात्र अनेक वर्षांपासून गुळुंचे गावात वास्तव्यास असणाऱ्या देऊळवाले समाजात कायमच्या भटकंतीमुळे मृत्यूनंतर मूठमाती देण्याची प्रथा होती. परंतु या समाजातील एका महिलेच्या निधनानंतर मृतदेहावर अग्निसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला.तुकाई टेकडीच्या खाली देऊळवाले समाजातील लोकांची वस्ती आहे. त्यांची पाच ते सहा घरे आहेत. येथील पूनम शंकर निंबाळकर (वय २५) या महिलेचे निधन झाले. हा समाज आजवर भटके जीवन जगत आला आहे. भटकंती दरम्यान एखाद्याचे निधन झाल्यास त्याच्या मृतदेहाला मूठमाती दिली जाई. आता मात्र स्थिर जीवन जगत असल्याने मृतदेहाला अग्निसंस्कार देणे अधिक योग्य आहे, असा निर्णय समाजातील ज्येष्ठांनी घेतला. मात्र गावात अग्नीसंस्कार करून देण्यास काहींचा विरोध होता. सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी या कुटुंबांना धीर दिला व गावच्या सरपंच रत्नमाला जगताप यांचे पती व सांसद आदर्श ग्राम समित्यांचे समन्वयक सुरेश जगताप यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. जगताप यांनी देऊळवाले समाजातील नागरिकांच्या भूमिकेला पाठबळ दिले.आजही गावाबाहेरच..अनेक वर्षांपासून ही कुटुंबे गावाबाहेर उघड्यावर संसार थाटून आपली उपजीविका करत आहेत. शिधापत्रिका, मतदानकार्ड असूनही आजही या लोकांना गावाचे रहिवासी ठरविण्यात येत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.