शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आता गावागावांतही मिळणार ‘आधार’

By admin | Updated: August 27, 2015 04:46 IST

आधार कार्ड नोंदणीसाठी खेडेगावातील ग्रामस्थांचे हेलपाटे टाळण्यासाठी तसेच या मोहिमेला गती देण्यासाठी शासनाने संग्राम कक्षातील आॅपरेटरची मदत घेण्याचे ठरविले असून

पुणे : आधार कार्ड नोंदणीसाठी खेडेगावातील ग्रामस्थांचे हेलपाटे टाळण्यासाठी तसेच या मोहिमेला गती देण्यासाठी शासनाने संग्राम कक्षातील आॅपरेटरची मदत घेण्याचे ठरविले असून, आता त्यांच्यामार्फत ग्रामपंचायतीतच आधार कार्ड देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.यासाठीचे दोन दिवसांचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेत झाले असून, लवकरच हे संग्राम आॅपरेटर आधार आॅपरेटर म्हणूनही काम पाहणार आहेत.ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्यांतील विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी राज्यातील ग्रामपंचायतीतील संग्राम आॅपरेटरची मदत घेण्याच्या प्रस्तावाला सहमती मिळाली असून, त्यानुसार राज्यात नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, नागपूर, पुणे व औरंगाबाद या जिल्ह्यांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत संग्राम कक्षातील आॅपरेटरना प्रशिक्षण दिले जात असून, प्रशिक्षणानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत जे पास होतात, त्यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांची या कामासाठी निवड करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील ३५० संग्राम आॅपरेटरना २५ व २६ आॅगस्ट असे दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. त्यांची २७ आॅगस्टला परीक्षा घेण्यात येईल. हे प्रशिक्षित आॅपरेटर त्या-त्या ग्रामपंचायतीत सर्व शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आठवडेबाजार, मोठ्या यात्रा, मोठे दवाखाने, प्रसूतिगृह (खासगी किंवा सरकारी) आदी ठिकाणी गरजेनुसार कॅम्प लावून आधार नोंदणी करणार आहेत. त्यांनी या नोंदणीसाठी ग्रामस्थ किंवा विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारायचे नाही, अशा स्पष्ट सूचना असून, तसे केल्यास संगणक परिचालक किंवा ग्रामपंचायतींवर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)आधारला मिळणार गतीजिल्ह्यात ९४ लाख २९ हजार ४०८ लोकसंख्या असून, ४७ लाख ५८ हजार २३५ नागरिकांनी आधार नोंदणी केली आहे. अजून ४६ लाख ७१ हजार १७३ नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी केलेली नाही. जिल्ह्यातील प्रशिक्षण दिलेल्या ३५० आॅपरेटरपैैकी साधारण २०० आॅपरेटर ही परीक्षा पास होतील, असा अंदाज आहे. आता जिल्ह्यात १७० मशीन उपलब्ध आहेत. आणखी मशीन शासनातर्फे मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता आधार नोंदणीला गती येईल. ग्रामस्थांना पूर्वकल्पनाज्या गावात किंवा सार्वजनिक ठिकाणी हा आधारचा कॅम्प होणार आहे, तेथे गावात दवंडी किंवा इतर माध्यमातून पूर्वकल्पना देण्यात येईल. तसेच, ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही, त्यांना फॉर्म देऊन अगोदरच तो भरून घेतला जाणार आहे. हा कॅम्प सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्र्यंत ठेवून त्या गावातील सर्व नागरिकांना आधार कार्ड देण्याचा मानस आहे.