शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

ईडीकडून नोटीस म्हणजे बदनाम करण्याचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:15 IST

पुणे : केंद्र शासनाविरोधात बोलणाऱ्ंयांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे आणि त्यांना बदनाम करण्याचे केंद्र शासनाचे ...

पुणे : केंद्र शासनाविरोधात बोलणाऱ्ंयांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे आणि त्यांना बदनाम करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आता सर्वसामान्य जनतेला समजले आहे. मात्र, नोटीस बजावून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली. तसेच राज्यातील सरकार पाडण्यासाठी ईडीकडून दबाव आणून जात असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सांगत आहेत, याचा अर्थ त्यात तथ्य असेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सायरस एस. पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी पाटील पत्रकारांशी बोलत होते. कार्यक्रमास लीला पूनावाला फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोझ पूनावाला, संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, बाबूराव जवळेकर, उदय पुंडे, मोहिनी तेलंग, डॉ. शाम राजोरे, डॉ. मिलिंद तेलंग, सुभाष अगरवाल, डॉ. आय. एस. मुल्ला, अ‍ॅड. भगवान बेंद्रे, जवाहरलाल बोथरा, शशिकांत पवार, दिलीप गिरमकर, दुर्गा देशमुख उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘केंद्र शासनाविरुद्ध बोलणाऱ्यांना बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. परंतु, त्यातून काहीही साध्य होणार नाही.महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ईडीच्या माधमातून दबाव आणला जात असल्याचे वक्तव्य खासदार राऊत यांनी केले. त्यामुळे यात तथ्य असणारच. तसेच मिशन संपल्याशिवाय मी कोल्हापूरला जाणार नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावर पाटील म्हणाले, त्यांच्याविषयी मी शक्यतो काही बोलत नाही.

दरम्यान, कॅम्प एज्युकेशन सोसायटीने काळाची गरज ओळखून नव्या पिढीला स्वत:च्या पायांवर उभे करण्यासाठी कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण देण्याचे पाऊल उचलले असून संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधील परदेशी भाषा, बेकरी उत्पादन, स्पा यांसारख्या अभ्यासक्रमांमुळे युवकांना सक्षमपणे स्वयंरोजगार सुरू करता येतील, असे गौरवोद्गार पाटील काढले.

संचेती म्हणाले, डॉ. सायरस एस. पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून सर्व स्तरांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाणार आहे.

गौरी प्रभुणे यांनी सूत्रसंचालन, तर दुर्गा देशमुख यांनी आभार मानले.