शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

ईडीकडून नोटीस म्हणजे बदनाम करण्याचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:15 IST

पुणे : केंद्र शासनाविरोधात बोलणाऱ्ंयांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे आणि त्यांना बदनाम करण्याचे केंद्र शासनाचे ...

पुणे : केंद्र शासनाविरोधात बोलणाऱ्ंयांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे आणि त्यांना बदनाम करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आता सर्वसामान्य जनतेला समजले आहे. मात्र, नोटीस बजावून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली. तसेच राज्यातील सरकार पाडण्यासाठी ईडीकडून दबाव आणून जात असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सांगत आहेत, याचा अर्थ त्यात तथ्य असेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सायरस एस. पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी पाटील पत्रकारांशी बोलत होते. कार्यक्रमास लीला पूनावाला फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोझ पूनावाला, संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, बाबूराव जवळेकर, उदय पुंडे, मोहिनी तेलंग, डॉ. शाम राजोरे, डॉ. मिलिंद तेलंग, सुभाष अगरवाल, डॉ. आय. एस. मुल्ला, अ‍ॅड. भगवान बेंद्रे, जवाहरलाल बोथरा, शशिकांत पवार, दिलीप गिरमकर, दुर्गा देशमुख उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘केंद्र शासनाविरुद्ध बोलणाऱ्यांना बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. परंतु, त्यातून काहीही साध्य होणार नाही.महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ईडीच्या माधमातून दबाव आणला जात असल्याचे वक्तव्य खासदार राऊत यांनी केले. त्यामुळे यात तथ्य असणारच. तसेच मिशन संपल्याशिवाय मी कोल्हापूरला जाणार नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावर पाटील म्हणाले, त्यांच्याविषयी मी शक्यतो काही बोलत नाही.

दरम्यान, कॅम्प एज्युकेशन सोसायटीने काळाची गरज ओळखून नव्या पिढीला स्वत:च्या पायांवर उभे करण्यासाठी कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण देण्याचे पाऊल उचलले असून संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधील परदेशी भाषा, बेकरी उत्पादन, स्पा यांसारख्या अभ्यासक्रमांमुळे युवकांना सक्षमपणे स्वयंरोजगार सुरू करता येतील, असे गौरवोद्गार पाटील काढले.

संचेती म्हणाले, डॉ. सायरस एस. पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून सर्व स्तरांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाणार आहे.

गौरी प्रभुणे यांनी सूत्रसंचालन, तर दुर्गा देशमुख यांनी आभार मानले.