शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

पोलिंग एजंटांसाठी काहीही

By admin | Updated: February 22, 2017 03:22 IST

मतदान केंद्रात उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून दिवसभर थांबणारे आणि मतदान केंद्राबाहेर एखाद्या

पुणे : मतदान केंद्रात उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून दिवसभर थांबणारे आणि मतदान केंद्राबाहेर एखाद्या टेबलावर थांबणारे पोलिंग एजंट हे कोणत्याही उमेदवारांचा महत्त्वाचा कणा़ त्यामुळे या पोलिंग एजंटने आपले काम चोख आणि एका जागी बसून करावे यासाठी त्यांची तेवढीच काळजी उमेदवार व त्याचे प्रतिनिधी घेताना दिसत होते़ या पोलिंग एजंटना सकाळी सव्वा सात वाजताच मतदान केंद्रांवर हजर राहण्यास सांगण्यात आले होते़ त्यानुसार प्रमुख उमेदवारांचे प्रतिनिधी सकाळीच मतदान केंद्रांवर उपस्थित होते़ त्यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशिनचे सील उघडून त्यात अगोदर कोणतेही मत टाकण्यात आलेले नाही, हे दाखविण्यात आले़ त्यानंतर डमी मतदान करून ज्या उमेदवारांना मत दिले, त्याच उमेदवारांना मत दाखविले जात असल्याचे प्रात्यक्षिक सर्वांसमोर करून दाखविण्यात आले़ पोलिंग एजंटचे त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होते़ आलेल्या मतदारांची नोंद घेऊन मतदार यादीवर खूण करणे ही प्रमुख जबाबदारी असते़ त्यात मतदान केंद्रावर कशी गर्दी आहे, त्यावर त्या एजंटला किती आणि केव्हा जादा काम करावे लागेल, हे अवलंबून असते़ अनेक उमेदवारांनी या पोलिंग एजंटला ज्यांच्या जागेवरच चहा, नाश्ता आणि त्यानंतर दुपारचे जेवण पुरविले़ काही एजंटना नाश्ता उशिरा मिळाला़ अनेक उमेदवारांनी या एजंटांना पुरी भाजी, तर काहींना व्हेज पुलाव दुपारी जेवणासाठी पुरविला़ त्याबरोबर मिनरल बॉटलही देण्यात आल्या. (प्रतिनिधी) एजंटांना जेवण पुरविण्याची जबाबदारी स्वतंत्र कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली होती़ गणेशखिंड रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन येथील मतदान केंद्रात खूप आतपर्यंत चालत जावे लागते़  या कार्यकर्त्याला दोनदा हेलपाटा मारावा लागला असता़ त्यामुळे या एजंटांना जेवण व पाणी बॉटल पुरविणाऱ्या तरुणाने आपल्या जीन्स पँटच्या चारही खिशामध्ये चार पाण्याच्या बाटल्या घातल्या व दोन्ही हातात फूड पॅकेट घेऊन तो आतमध्ये चालत गेला़  अनेक उमेदवारांनी पोलिंग एजंटांना नाश्ता, जेवण पुरविण्यासाठी स्वतंत्र गाडी ठेवली होती़ पाण्याचीही  व्यवस्था नाही अनेक केंद्रांवर कर्मचाऱ्यांसाठी पाण्याचीही व्यवस्था नसल्याचे दिसून आले. प्रभाग ३३ मधील एका केंद्रात सोमवारी संपूर्ण फरशीवर पाणी पडले होते. कर्मचाऱ्यांनीच हे पाणी पुसून स्वच्छता केली.  तसेच स्वच्छतागृहाचीही व्यवस्था नसल्याने त्रास सहन करावा लागला. रात्री मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगली व्यवस्था नसल्याने मनस्ताप सहन करावा लागल्याचे एका केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.काही कर्मचारी उपाशीच काही केंद्रांवर दुपारी मतदान केंद्रांवर गर्दी असल्याने कर्मचाऱ्यांना जेवणासाठीही वेळ मिळाला नाही. बिस्किटे, वेफर्स, फळे खावून त्यांना दिवसभर काम करावे लागले. काही केंद्रांच्या जवळपास हॉटेल किंवा छोटी दुकानेही नसल्याने या कर्मचाऱ्यांना ताटकळत बसावे लागले.  उमेदवारांच्या प्रतिनिधींनी त्यांना वडापाव, भेळ असे खायला आणून दिले. तसेच पाण्याचीही व्यवस्था त्यांनीच केली. तेही मतदान केंद्रावरील गर्दी तुरळक झाल्यानंतर खाण्याची संधी मिळत होती.