शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एकलकोंडेपणामुळे घरटे झाले उद्ध्वस्त

By admin | Updated: July 24, 2016 05:27 IST

घरात बोलायला कोणी नाही, मुलीशी खेळायला कोणी नाही, आपले कसे व्हायचे? अशा विवंचनेत असलेल्या नीलम भामे या महिलेने घरात पोटचा गोळा असलेल्या लावण्या या सहा वर्षांच्या मुलीचा

पिंपरी : घरात बोलायला कोणी नाही, मुलीशी खेळायला कोणी नाही, आपले कसे व्हायचे? अशा विवंचनेत असलेल्या नीलम भामे या महिलेने घरात पोटचा गोळा असलेल्या लावण्या या सहा वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला. नंतर पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन स्वत: आत्महत्या केली. एकाकीपणामुळे आलेल्या नैराश्यातून आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचे तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. मुलीसह पत्नीने स्वत:ला संपविल्याने आता पतीवर एकाकी जीवन जगण्याची वेळ आली आहे. खाली व्यापारी गाळे, वरच्या मजल्यावर निवासी गाळे, आजूबाजूला पेट्रोल पंप, दुकाने, थोडे अंतर पुढे गेल्यास कंपन्यांचा परिसर अशा ठिकाणी कासारवाडीत झेप या इमारतीत भामे कुटुंबीय राहतात. सचिन भामे, पत्नी नीलम, सहा वर्षांची मुलगी लावण्या, तसेच सचिन यांचे आई-वडील असे पाच जण त्या ठिकाणी राहत होते. नीलम आणि सचिन यांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. नीलम हिचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले. त्यांचा संसाराचा गाडा सुरळीत चालला होता. मुलगी लावण्या ही मोरवाडीतील एसएनबीपी शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत होती.त्याच इमारतीत नीलमचे चुलत सासरेसुद्धा राहत होते. त्यांच्याशी नीलमचे जमत नव्हते. त्यामुळे जवळचे असूनही त्यांच्यात बोलणे होत नव्हते. कामावरून घरी आल्यानंतर सांयकाळी पतीचे संभाषण व्हायचे एवढेच. इतरवेळी कोणी बोलायला नाही, कोणी समजून घेणारे नाही. त्यामुळे मनाची अवस्था एकलकोंडेपणाची झाली. शनिवारी सकाळी नीलमचे पती सचिन हडपसरला कामाला गेले होते. सासू व सासरे औंध येथील दाताच्या रुग्णालयात गेले होते. या वेळी नीलमने मुख्य दरवाजाला आतून कडी लावून शयनगृहात ओढणीच्या साहाय्याने लावण्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:च्या हाताच्या मनगटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन यांना जेव्हा घरात घडलेल्या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. होत्याचे नव्हते झाले असल्याने ते अक्षरश: कोलमडले. दुर्धर आजाराने त्रस्त अथवा कर्जबाजारी झाल्याने संसाराचा गाडा हाकणे कठीण होते. अशावेळी कुटुंबातील सदस्यांना संपवून स्वत: आत्महत्या केल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. परंतु, अशा प्रकारच्या वेगळ्याच नैराश्यातून ही घटना घडल्याचे मानले जात आहे. वेगळे काही कारण असू शकते का, याचा शोध पोलीस घेत आहेत.