शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मदत पुनर्वसनाचा औषधांसाठी पशुसंवर्धनबरोबर असहकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापुराचा फटका बसलेल्या परिसरात साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी प्रयत्न करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला मदत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापुराचा फटका बसलेल्या परिसरात साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी प्रयत्न करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला मदत व पुनर्वसन विभागाच्या असहकाराचा सामना करावा लागत आहे. जनावरांच्या औषध खरेदीसाठी हा विभाग काहीच मदत करायला तयार नसल्याने खात्यातील वरिष्ठ त्रस्त झाले आहेत.

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड, चिपळूण व राज्यातील अन्य अनेक जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला. अन्य सर्व खात्यांप्रमाणेच पशुसंवर्धन विभागही यात मदतीसाठी सरसावला आहे. आयुक्त डॉ. सचिंद्रप्रताप सिंह, अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी यासाठी मुख्यालयात वॉर रूम स्थापन केली आहे. तेथून पूर आलेल्या भागातील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स करून त्यांंना सूचना दिल्या जात आहेत.

पुरात सापडून जनावरे मृत होतात. पाण्यात प्रमाणापेक्षा भिजल्याने काही आजारी होतात. त्यांच्यापासून साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळेच पशुसंवर्धनने जिल्ह्यांमधील, तालुक्यांमधील आपले सर्व अधिकारी, कर्मचारी सक्रिय केले आहेत. मृत जनावरांची त्वरित शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी, आजारी जनावरांवर तातडीने औषधोपचार सुरू करावेत, त्यांना प्रतिबंधात्मक लसी द्याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.

यासाठी एरवी लागतात त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात औषधे, लसी लागत आहेत. त्या मिळवून द्याव्यात, अशी मागणी पशुसंवर्धनने मदत पुनर्वसनकडे केली. मात्र, त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे समजते.

साठा कमी पडत असल्याच्या तक्रारी आल्यावरून मुंबईतील बैठकीत मंत्र्यांसमोर याविषयी चर्चा झाली. पशुसंवर्धनला आवश्यक ती औषधे, लसी त्वरेने उपलब्ध करून देण्याविषयी वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितले. मात्र, तरीही मदत पुनर्वसनकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे पशुसंवर्धनचे म्हणणे आहे.

पशूपासून होणारे आजार संसर्गजन्य असतात. अन्य पशूंना ते लगेच होतात. त्याचप्रमाणे विषाणूंचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्यास त्याचा मानवी आरोग्यावरही अनिष्ट परिणाम होऊ शकतो. एरवीच्या साधारण परिस्थितीत पुरेल इतका साठा पशुसंवर्धनच्या स्थानिक विभागांकडे असतोच. मात्र, आता मोठ्या संख्येने औषधे लागत आहेत. त्याचा पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे, असे पशुसंवर्धन विभागातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

----///

सध्या आहे त्या औषधांवर आमचे अधिकारी गरज भागवत आहेत. नव्या साठ्याची मागणी केली आहे. अडचण येऊ नये असे वाटते.

डॉ. धनंजय परकाळे, अतिरिक्त संचालक, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र