शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

दहावीला ९५ टक्क्यांपुढे असतील तरच नामांकित महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अकरावी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, येत्या शुक्रवारी विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अकरावी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, येत्या शुक्रवारी विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरी अंतर्गत गुणवत्तेनुसार महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता शहरातील नामांकित महाविद्यालयात ९५ टक्क्यांहून अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील ३११ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख ११ हजार २०५ जागांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले. मात्र, केवळ ७९ हजार २४६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली. त्यातील ७१ हजार ६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून ‘लॉक’ केला असून, ७० हजार ३४० विद्यार्थ्यांचा अर्ज तपासण्यात आला आहे. मात्र, पहिल्या फेरीसाठी केवळ ५९ हजार ८८९ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवले आहेत.

कोरोनामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल प्रसिद्ध करण्यात आला. परिणामी राज्यातील तब्बल ९१ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेशाचा कटऑफ निश्चितच वाढणार आहे. मागील वर्षी फर्ग्युसन, बीएमसीसीसारख्या नामांकित महाविद्यालयांचा पहिल्या फेरीचा कट-ऑफ ९७ ते ९८ टक्क्यांपर्यंत होता. त्यामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चौकट

“अकरावी प्रवेशाबाबत प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवारी सकाळी महाविद्यालयांची ॲलॉटमेंट यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ ते ३० ऑगस्ट या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. तसेच पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळूनही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही तर, संबंधित विद्यार्थ्याला पुढील दोन प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी करून घेतले जाणार नाही.”

-मीना शेंडकर, सहाय्यक शिक्षण संचालक, पुणे विभागीय शिक्षण