शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

ना शाळा, ना परीक्षा, २० लाख विद्यार्थ्यांना ‘ढकलले’ पुढच्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

राहुल शिंदे पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दहावी-बारावी ...

राहुल शिंदे

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. दहावी-बारावी सोडून सर्वच विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला. मात्र, दहावी-बारावीचे विद्यार्थीसुद्धा नापास होणार नसल्याचे राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या निकालाच्या सूत्रावरून दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २० लाख ३५ हजार विद्यार्थी शाळेत न जाता आणि परीक्षा न देता उत्तीर्ण होणार आहेत.

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. केवळ जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्याच नव्हे तर खासगी अनुदानित व खासगी विनाअनुदानित शाळांची संख्याही खूप मोठी आहे. जिल्ह्यात एकूण ७ हजार ४५५ शाळा असून त्यात इयत्ता पहिली ते बारावीचे २० लाख ३५ हजार ८०७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, कोरोनामुळे वर्षभर अनेक शाळाच सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून त्यांची परीक्षा घेणेही शक्य नव्हते. त्यामुळे शासनाने सर्वांना पुढच्या वर्गात ढकलले आहे.

चौकट

“शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला अडसर लागला आहे. आभासी शिक्षणामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळली असून विद्यार्थी-शिक्षक संवाद थांबला आहे. म्हणजेच अंतरक्रियेवरही परिणाम झाला आहे. शिक्षणात अंतरक्रियेला खूप महत्त्व आहे. वर्गातील शिक्षणाला दुसरा पर्यायच नाही. प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाही तोपर्यंत शिक्षण क्षेत्रात आलेली निष्क्रियता दूर होणार नाही.”

-गोविंद नांदेडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

चौकट

‘ग्रामीण-शहरी’ यांच्यात दरी

“शहरात भौतिक सुविधा असल्याने शिक्षण प्रक्रिया सुरू होती. मात्र, ग्रामीण भागात लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांना काही काळ मोबाइल मिळाला. अनलॉक सुरू झाल्यावर पालक कामानिमित्ताने घराबाहेर पडले. त्यामुळे मुलांना मोबाईल मिळणे बंद झाले. आर्थिक परिस्थिती बिघडल्याने काहींना मोबाईल इंटरनेट रिचार्ज करता आले नाही. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचले किंवा नाही हे शिक्षकांना समजले नाही. परिणामी ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दरी निर्माण झाली.”

- महेंद्र गणपुले, प्रवक्त, मुख्याध्यापक संघ

चौकट

“ऑनलाइन शिक्षणाकडे हौस म्हणून पाहिले जात होते. परंतु,या पद्धतीला आता अध्ययन अध्यापनात नियमित शिक्षणात स्थान द्यावे लागेल हे समजले. ऑनलाईनमुळे शिक्षक व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कमी खर्चात व वेळेच्या बचतीमध्ये करणे शक्य झाले. तंत्रात बदल झाला. परंतु, शिक्षण पद्धती जुनीच राहिली. येत्या काळात यात बदल करावा लागेल.”

-वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

चौकट

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा - ४ हजार २१०

खासगी अनुदानित शाळा - १ हजार ३४६

खासगी विनाअनुदानित शाळा - १ हजार ८५७

एकूण शाळा - ७ हजार ४५५

एकूण विद्यार्थी - २० लाख ३५ हजार ८०७

चौकट

कुठल्या वर्गात किती विद्यार्थी?

पहिली - १ लाख ९० हजार ६१

दुसरी -१ लाख ९२ हजार ५९२

तिसरी -१ लाख ९० हजार १३७

चौथी -१ लाख ९० हजार ५७५

पाचवी -१ लाख ८६ हजार ९९६

सहावी -१ लाख ८३ हजार २१४

सातवी -१ लाख ७७ हजार ८७३

आठवी -१ लाख ७० हजार ८२२

नववी - १ लाख ६७ हजार ८६२

दहावी - १ लाख ४४ हजार ३८४

अकरावी -१ लाख २३ हजार ४३

बारावी -१ लाख १८ हजार २४८