शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या नियोजनात नाही शेतकऱ्यांना स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : पाण्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र पाण्यावर हक्क ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : पाण्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र पाण्यावर हक्क असणाऱ्या शेतकऱ्यांनाच त्यावर स्थान दिले नाही. त्यामुळे प्राधिकरणावरील इतर रिक्त जागा भरताना शेतकरी प्रतिनिधीची नियुक्ती करण्याची मागणी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भूगर्भातील आणि भूपृष्ठावरील पाण्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाला अर्ध न्यायिक दर्जा आहे. प्राधिकरणामार्फत जलसंपदेचे समन्यायिक वाटप करणे, व्यवस्थापन करणे, पाणीपट्टी दर निश्चित करणे, पाणी वापराचे हक्क निश्चित करणे, पाणी वापराच्या हक्काची अंमलबजावणी करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्राधिकरणाला आहे.

जलसंपत्ती प्राधिकरण अधिनियम २०१६ नुसार प्राधिकरणावरील पदांची संख्या पाच त्यात भूजल, अभियांत्रिकी, विधी आणि अर्थ अशा विविध क्षेत्रांतील सदस्य त्यावर कार्यरत आहेत. भूजल ओढ निर्माण केल्यापासून रिक्त आहे. अभियांत्रिकी आणि अर्थव्यवस्था या पदावरील व्यक्तींचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. प्राधिकरणाकडे पाण्यासंबंधी अनेक सुनावण्या होतात. त्यामुळे रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.

शेतीच्या पाण्यासाठी नियम करण्याचे काम प्राधिकरण करते. त्यामुळे प्राधिकरणावर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. रिक्त जागा भरण्याबरोबरच शेतकरी प्रतिनिधीची नियुक्ती प्राधिकरणावर करावी, अशी मागणी बारामती तालुक्यातील उंडवडी गावचे माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.