शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या नियोजनात नाही शेतकऱ्यांना स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : पाण्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र पाण्यावर हक्क ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : पाण्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र पाण्यावर हक्क असणाऱ्या शेतकऱ्यांनाच त्यावर स्थान दिले नाही. त्यामुळे प्राधिकरणावरील इतर रिक्त जागा भरताना शेतकरी प्रतिनिधीची नियुक्ती करण्याची मागणी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भूगर्भातील आणि भूपृष्ठावरील पाण्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाला अर्ध न्यायिक दर्जा आहे. प्राधिकरणामार्फत जलसंपदेचे समन्यायिक वाटप करणे, व्यवस्थापन करणे, पाणीपट्टी दर निश्चित करणे, पाणी वापराचे हक्क निश्चित करणे, पाणी वापराच्या हक्काची अंमलबजावणी करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्राधिकरणाला आहे.

जलसंपत्ती प्राधिकरण अधिनियम २०१६ नुसार प्राधिकरणावरील पदांची संख्या पाच त्यात भूजल, अभियांत्रिकी, विधी आणि अर्थ अशा विविध क्षेत्रांतील सदस्य त्यावर कार्यरत आहेत. भूजल ओढ निर्माण केल्यापासून रिक्त आहे. अभियांत्रिकी आणि अर्थव्यवस्था या पदावरील व्यक्तींचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. प्राधिकरणाकडे पाण्यासंबंधी अनेक सुनावण्या होतात. त्यामुळे रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.

शेतीच्या पाण्यासाठी नियम करण्याचे काम प्राधिकरण करते. त्यामुळे प्राधिकरणावर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. रिक्त जागा भरण्याबरोबरच शेतकरी प्रतिनिधीची नियुक्ती प्राधिकरणावर करावी, अशी मागणी बारामती तालुक्यातील उंडवडी गावचे माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.