शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

‘दुपारी चारनंतर पुण्याच्या रस्त्यावर कोणी दिसता कामा नये’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह पुण्यातही पुन्हा रुग्ण वाढताना दिसत आहे. कोरोनाचे दोन डोस घेतलेले लोक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह पुण्यातही पुन्हा रुग्ण वाढताना दिसत आहे. कोरोनाचे दोन डोस घेतलेले लोक अधिक बेफिकीर होताना दिसत असून ही धोक्याची घंटा ठरू शकते. यामुळेच शहर आणि जिल्ह्यात सध्याचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर “पुण्यात दुपारी चारनंतर रस्त्यावर गर्दी केल्यास नागरिकांसह पथारी व्यावसायिक व हातगाडीधारकांवर कडक कारवाई करा,” असा आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिला आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. ९) कोरोना आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, आमदार माधुरी मिसाळ, दिलीप मोहीते, राहुल कुल, अशोक पवार, सुनिल शेळके, अतुल बेनके, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

“शहरासह संपूर्ण जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी दर कमी होत असला तरी मृत्यूदर अपेक्षित प्रमाणात कमी झालेला नाही. त्यात सध्या जिल्ह्यात पन्नास लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात दोन्ही डोस घेतलेले लोक अधिक बेफिकीर झाले असून मास्क न लावता फिरताना दिसत आहे. हे खूप धोक्याचे आहे. आयसीएमआरने लसीकरण पूर्ण झाले तरी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे,” असे पवार यांनी सांगितले.

चौकट

पर्यटकांवर कडक कारवाई करा

जिल्ह्यातल्या पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी केली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे. अशा ठिकाणी कोरोनाबाबतच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. कोणत्याही परिस्थितीत नियम पाळलेच पाहिजेत. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे हे सर्वांच्याच हिताचेच आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

चौकट

आणखी त्रासाची ठेवा तयारी

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून नव्या बाधितांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याचे गेल्या पंधरवड्यातील चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापारी पेठा, व्यवसाय, मॉल आदींना दुपारी चारनंतर वेळ वाढवून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसा दिलासा मिळाला नाही. उलट अजित पवार यांनी कारवाई कडक करण्याचे आदेश दिल्याने पुणेकरांना आता प्रशासनाकडून आणखी ससेहोलपट सहन करावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे.