शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

पुणे जिल्ह्यातील एकही गाव नाही वगळले

By admin | Updated: September 11, 2015 04:51 IST

सहा राज्यांमध्ये पसरलेला पश्चिम घाट संरक्षित व संवर्धित करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन विभागाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा (एरे) नवीन मसुदा प्रसिद्ध केला असून, त्यामधून

- नीलेश काण्णव,  घोडेगावसहा राज्यांमध्ये पसरलेला पश्चिम घाट संरक्षित व संवर्धित करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन विभागाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा (एरे) नवीन मसुदा प्रसिद्ध केला असून, त्यामधून पुणे जिल्ह्यातील एकही गाव वगळण्यात आलेले नाही. पुणे जिल्ह्यातील ३३७ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. जैवविविधता नियंत्रण मंडळाने २० टक्के नैसर्गिक भाग असलेली गावे एरेमध्ये घेण्याच्या सूचना केल्या होत्या. सहा राज्यांतील अनेक गावे कमी झाली आहेत; मात्र पुणे जिल्ह्यातील एकही गाव कमी झाले नाही.महाराष्ट्रातील अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नंदुरबार, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. यापूर्वीची अधिसूचना १० मार्च २०१४ रोजी निघाली होती. या अधिसूचनेवर सहा राज्यांचे अभिप्राय मागविण्यात आले. त्यांनी केलेल्या सूचना व बदल यांचा विचार करून नवीन मसुद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या मसुद्यात पश्चिम घाटातील जैवविविधता जपण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबरच अनुसूचित जाती व परंपरागत वनवासी यांचे पूर्ण हक्क अबाधित ठेवले आहेत. केंद्र शासनाने नेमलेल्या समितीने सर्व समाविष्ट गावांचा अभ्यास करून त्यातील काही गावांचा समावेश करण्याची गरज नसल्याचे अहवालात नमूद केले आहे़ त्यात पुणे जिल्ह्यातील काही गावांचा समावेश आहे़ यासंबंधीची पुढील कार्यवाही राज्य शासनाने करायची असल्याचे सांगण्यात आले़ पुणे जिल्ह्यातील ३३७ गावे यामध्ये असून, आंबेगाव ३७, भोर ५६, हवेली ४, जुन्नर ३२, खेड २२, मावळ ४९, मुळशी ६५, पुरंदर ९, वेल्हे ६० गावांचा समावेश आहे. पश्चिम घाटातील सहा राज्यांतील ५६८२५ चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये केरळमधील ९९९६, गुजरात ४४९, महाराष्ट्र १७३४०, गोवा १४६१, कर्नाटक २०६६८, तमिळनाडू ६९१४ चौरस किलोमीटर क्षेत्र आहे.