शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून नाही नवीन रेल्वेमार्ग

By admin | Updated: February 2, 2017 03:55 IST

मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र अंदाजपत्रक असलेली रेल्वे यंदाच्या अंदाजपत्रकातून घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही ठळक बाबी वगळता

पुणे/पिंपरी : मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र अंदाजपत्रक असलेली रेल्वे यंदाच्या अंदाजपत्रकातून घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही ठळक बाबी वगळता रेल्वेबाबत फारशा काही घोषणा केल्या नाहीत. सर्वसामान्य प्रवाशांना अपेक्षित असलेल्या नवीन गाड्या, प्रकल्प, नवीन मार्ग अशा मुद्यांचा उल्लेख नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच रेल्वे प्रशासनही याबाबत अनभिज्ञ असून, सविस्तर माहिती मिळण्यास किमान एक-दोन दिवसांचा कालावधी लागेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले असून, दररोज सुमारे साडे तीन कोटींहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रेल्वेचे स्वतंत्र अंदाजपत्रक दरवर्षी सादर केले जात होते. यंदापासून स्वतंत्र अंदाजपत्रक बंद करण्यात आले आहे. पूर्वी रेल्वे अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित मार्ग, नवीन गाड्या, योजना, प्रकल्प, स्थानकांची सुधारणा, सुरक्षा यांसह विविध पायाभूत सुविधांचा उल्लेख ठळकपणे केला जात असे. त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चाही होत होती. प्रत्येक रेल्वे प्रवाशाला अंदाजपत्रकाची उत्सुकता असायची. मंगळवारी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये यापैकी कोणतीही अपेक्षा पूर्ण झालेली नाही. जेटली यांनी रेल्वेबाबत काही ठळक घोषणा केल्या असल्या, तरी त्यामध्ये नव्या गाड्या, मार्गांचा समावेश नाही. याबाबत रेल्वे प्रशासनही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. रेल्वे प्रवासी, संघटनांकडून प्रशासनाकडे याबाबत विचारणा होत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र, दिल्लीकडे डोळे लावून बसले होते. दिवसभरात केवळ मुख्य तरतुदींची माहिती देण्यात आली. याबाबत प्रवाशांसह संघटनांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. जेटली यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकातून काहीही बोध होत नाही.केवळ ठळक घोषणा करून रेल्वेची बोळवण करण्यात आली आहे. किमान अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर रेल्वेकडून सविस्तर माहिती प्रवाशांसाठी प्रसिद्ध करणे आवश्यक होते. एकीकडे रेल्वेची स्वायत्तता अबाधित राखण्याची घोषणा होत असताना त्यामध्ये पारदर्शकता दिसत नाही, अशी नाराजी रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)रेल्वेबाबत नवीन अर्थसंकल्प तयार झाला आहे. त्यात स्वच्छ रेलबाबत घोषणा केली आहे. सरकारने तिसऱ्याा रेल्वेमार्गाची घोषणा केली होती, पण अजूनही काम सुरू केले नाही. मेट्रो प्रकल्पदेखील पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर तयार होत आहे. त्यामुळे निगडी, आकुर्डी, चिंचवड भागातील नागरिक या सुविधेपासून वंचित राहत आहेत. ई-तिकीटमध्ये सवलत देण्यापेक्षा रेल्वे स्थानकावर जादा तिकीट घर करून पदवीधरांना नोकरी द्यावी. - गुलामअली भालदार, चिंचवड प्रवासी संघ