शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारीवर ‘नो केन’चे संकट

By admin | Updated: January 5, 2017 03:30 IST

ऊस गाळप हंगाम सुरू होऊन जेमतेम २ महिने झाले असताना जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यावर ‘नो केन’ म्हणजे गाळपासाठी अपुऱ्या उसाचे संकट ओढवले आहे.

केडगाव : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन जेमतेम २ महिने झाले असताना जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यावर ‘नो केन’ म्हणजे गाळपासाठी अपुऱ्या उसाचे संकट ओढवले आहे.नो केन संकटामुळे नववर्षाच्या सुरुवातीस नीरा भीमा, व्यंकटेश व अनुराज हे कारखाने बंद झाले आहेत. काही कारखाने पुरेशा उसाअभावी दिवसभरातील बहुतांशी तास बंद राहत आहेत. गेल्या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी ऊसपिक जळाले होते. तसेच बहुतांशी शेतकऱ्यांनी कोवळ्या उसाचे पाणीटंचाईमुळे गाळप केले. त्यामुळे या गळीत हंगामावर ऊसटंचाईचे सावट होते. भरीस भर राज्यसरकारने या वर्षी गळीत हंगाम उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सर्व संकटे असताना जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरच्या सुरुवातीस गळीत हंगाम सुरू झाला. अपुऱ्या उसाअभावी साखर कारखानदारांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील उसांची पळवापळवी सुरू केली. चांगल्या ऊसदराचे आमिष दाखवून बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांच्या टोळ्या पुणे जिल्ह्यात दाखल झाल्या. परंतु पुरेशा उसाअभावी जेमतेम ५० ते ६० दिवसांच्या हंगामानंतर कारखाने बंद झाले आहेत. याशिवाय कारखान्याचा सरासरी २५०० रुपये पहिला हप्ता किंवा बाजारभाव असताना स्थानिक गुऱ्हाळे प्रतिटन ३००० रुपये देऊन कारखान्यांशी स्पर्धा करीत आहेत. गुऱ्हाळ असणाऱ्या परिसरात काही ठिकाणी कृत्रिम ऊसटंचाई जाणवत आहे. प्रतिवर्षी सरासरी १५० दिवस चालणारा गळीत हंगाम यावर्षी ६० दिवसांत घरघरीस लागला आहे. सध्या जिल्ह्यातील बारामती अ‍ॅग्रो, दौंड शुगर्स, इंदापूर, नाथ म्हस्कोबा हे कारखाने सरासरी गाळप क्षमतेच्या निम्मेच गाळप करत असल्याने आठवड्याभरात ते कारखाने बंद होतील, असा अंदाज आहे. भीमा पाटस प्रशासनाने पुरेशा उसाअभावी कारखाना सुरू केला नाही, तर राजगड कारखान्याने अवघे ५७ हजार टन गाळप झाले आहे. जिल्ह्यामध्ये अंबालिका, सोमेश्वर, दौंड शुगर्स व इंदापूर कारखान्यांनी आतापर्यंत सर्वाधिक ३ लाख टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. बाकीचे कारखाने २ लाख टनाच्या आतच गाळप केलेले आहेत. सोमेश्वर कारखान्याने सर्वाधिक ११.१६ उच्चांकी साखर उतारा मिळवला आहे, तर नीरा भीमा कारखान्याचा उतारा नीचांकी ९.४७ घसरला आहे. त्यामुळे यावर्षी चांगला बाजारभाव मिळाला तरी एकरी सरासरी उत्पन्न घटले आहे.