शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीचे स्तोम नको - अभय टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 03:07 IST

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणाली लागू झाल्यानंतर सर्व काही सुटसुटीत आणि सुरळीत होईल. त्याचा अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होऊन आणि सर्व अडचणी दूर होतील, असे प्रचंड वातावरण निर्माण केले जात आहे. या प्रणालीचे फायदे-तोटे समजण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल.

पुणे : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणाली लागू झाल्यानंतर सर्व काही सुटसुटीत आणि सुरळीत होईल. त्याचा अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होऊन आणि सर्व अडचणी दूर होतील, असे प्रचंड वातावरण निर्माण केले जात आहे. या प्रणालीचे फायदे-तोटे समजण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल. या कायद्याने महागाई कमी होईल, याचे उत्तर, नाही असेच द्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी गुरुवारी येथे दिली.मुंबईच्या यशवंतराव प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने आयोजित ‘जीएसटी : काही अनुत्तरीत प्रश्न’ या विषयावर ते बोलत होते. केंद्रीय जीएसटीच्या उपायुक्त राजलक्ष्मी कदम, प्रतिष्ठानचे पुणे केंद्राचे अध्यक्ष अंकुश काकडे, दत्ता बाळसराफ, सीए प्रकाश झावरे-पाटील, वृषाली लोढा या वेळी उपस्थित होत्या. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम झाला.टिळक म्हणाले, सध्या कायद्याचा संक्रमण काळ आहे. त्यामुळे तो, राबविताना अनेक अडचणी येतील. मात्र, यातील फायदे आणि तोटे समजण्यास दोन वर्षांचा कालावधी लागेल. या करामुळे महागाई कमी होईल, की नाही हे देखील निश्चित सांगता येत नाही. कारण, धान्याच्या किमती, इंधन, गॅस अणि वीज यावर महागाईचा निर्देशांक अवलंबून असतो. जवळपास ८० टक्के इंधन आपल्याला आयात करावे लागते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर टिकून असल्याने महागाई निर्देशांकात फारसा बदल दिसत नाही.सरकारला विकासासाठी महसूलाची गरज असते. सातत्याने कराच्या दरात वाढ करणे शक्य होत नाही. त्या ऐवजी करदात्यांच्या संख्येत वाढ केल्यास, कर संकलनही वाढेल. त्याच दृष्टिकोनातून जीएसटीची रचना करण्यात आली असल्याचे वाटते, असेही टिळक यांनी या वेळी स्पष्ट केले.वस्तूवरील छापील किमतीवर जीएसटी आकारला जातो. जीएसटीसह हा छापील दर असतो. त्यामुळे त्या प्रमाणात रकमेचे वर्गीकरण विक्रेत्यांनी केले पाहिजे, असे झावरे-पाटील म्हणाले.जीएसटी प्रणाली अत्यंत सुटसुटीत करण्यात आली आहे. संपूर्ण प्रणाली संगणकीकृत असल्याने व्यापाºयांचा अधिकाºयांशी कमीत कमी संपर्क येईल. या मुळे अधिक पारदर्शकता येणार असून, ग्राहकांना देखील आपण कोणत्या वस्तू आणि सेवांवर किती कर भरला हे समजू शकेल.- राजलक्ष्मी कदम,उपायुक्त, केंद्रीय जीएसटीच्या