शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

एकाही कारखान्याने दिला नाही एफआरपी

By admin | Updated: April 23, 2015 06:30 IST

११ सहकारी व ५ खासगी कारखान्यांपैकी ४ कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे, तर उर्वरित १२ कारखान्यांची धुराडी येत्या १५ दिवसांत थंडावतील.

महेश जगताप ल्ल सोमेश्वरनगरया वर्षीचा साखर हंगाम संपत आला आहे; मात्र निवडणुकांच्या धामधुमीत उसाच्या एफआरपीचा मुद्दा अडगळीत पडला होता. पण, आता राज्य सरकारने एफआरपी देण्यासाठी ऊसउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देऊन २ हजार कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता एफआरपी मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.जिल्ह्यातील ११ सहकारी व ५ खासगी कारखान्यांपैकी ४ कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे, तर उर्वरित १२ कारखान्यांची धुराडी येत्या १५ दिवसांत थंडावतील. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची एफआरपी २,२०० ते २,३०० रुपये बसत असताना कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हातात अवघे १,८०० रुपये टेकवले. जिल्ह्यातील एकाही कारखान्याने शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी अदा केली नाही. साखर आयुक्तांनी, सहकारमंत्र्यांनी कारखान्यांना कारवाई करण्याचा इशारा दिला; मात्र त्यांच्या आदेशाकडे कोणत्याही साखर कारखान्याने लक्ष दिले नाही. मागील वर्षभरात साखरेचे दर प्रतिक्विंटल ७०० रुपयांनी कोसळल्याने किमान पूर्ण एफआरपी मिळण्याची शक्यता दुरावत चालली आहे. हंगाम संपत आला, तरीही अजून एफआरपी शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. मात्र, आता गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी राज्य सरकार ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. राज्य शासनाने २ हजार कोटी रुपयांच्या बिनव्याची कर्जाची घोषणा केली आहे. या कर्जात अजून ५०० कोटींनी वाढ होण्याचे संकेतही सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथील साखर आयुक्तालयावर तीव्र आंदोलन केल्यानंतर राज्य शासनाला जाग आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन एफआरपीबाबत चर्चा केली होती. त्या वेळी अर्थमंत्री जेटली यांनी २१ जानेवारीला बैठक घेऊन प्रश्र सोडवू, असे आश्वासन दिले होते. अखेर राज्य शासनाने २ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. ही रक्कम शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळण्यासाठी अजून एक महिना लागण्याची चिन्हे आहेत. वास्तविक, कारखाने सुरू झाल्यापासून १४ दिवसांच्या आत एफआरपी देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी साखर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. सहकारमंत्री व साखर आयुक्त यांनी शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी कारखान्यांवर अनेक प्रकारचे दबाव टाकले; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हंगाम संपण्याच्या मार्गावर आता शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या पैशाला कोणीच वाली उरला नव्हता. दुसरीकडे मात्र कारखानदारांनी, ‘साखरेला ३ हजार ते ३,२०० रुपये दर द्या; आम्ही शासनाच्या मदतीशिवाय एकरकमी शेतकऱ्यांना एफआरपी देऊ,’ अशी भूमिका घेतली होती. मात्र, साखर हंगाम सुरू झाल्यापासून राज्य बँकेने ४ वेळा साखरेचे मूल्यांकन कमी केल्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. चालू हंगामात राज्य बँकेने ४ वेळा साखरेचे मूल्यांकन कमी केल्यामुळेच एफआरपीचा प्रश्र गंभीर बनल्याचे कारखानदार सांगतात.