शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

महाविद्यालयांत राजकीय पक्षांना नो एंट्री

By admin | Updated: May 4, 2017 03:09 IST

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालये; तसेच विद्यापीठांमध्ये विद्यार्थी निवडणुका घेण्याच्या

दीपक जाधव / पुणेनवीन विद्यापीठ कायद्यानुसार आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालये; तसेच विद्यापीठांमध्ये विद्यार्थी निवडणुका घेण्याच्या परिनियमांना बुधवारी अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्ष, संघटनांना सहभागी होता येणार नाही. विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर निवडणूक लढवावी, अशी स्पष्ट शिफारस माजी कुलगुरू आर. एस. माळी यांच्या समितीने राज्य शासनाकडे केली आहे. सर्व महाविद्यालयांमध्ये एकाच दिवशी निवडणूक घेण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांच्या विभागांमध्ये निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. निवडणुकांचे परिनियम तयार करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर. एस. माळी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मंगळवार व बुधवार असे दोन दिवस समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विद्यार्थी निवडणुकांचे परिनियम तयार करून अंतिम स्वरूप देण्यात आले असल्याची माहिती आर. एस. माळी यांनी दिली. या शिफारशींना राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर त्या गॅझेटमध्ये प्रकाशित केल्या जातील. आगामी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर, आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होतील. महाविद्यालयांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना कार्यरत आहेत; मात्र राजकीय पक्ष, संघटना यांना या निवडणुकीमध्ये सहभागच घेता येणार नाही, अशी शिफारस करण्यात आली आहे. खर्चावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. महाविद्यालयांचे सुरुवातीचे दोन महिने निवडणुकींच्या गदारोळात जाणार आहेत. ही रणधुमाळी कशी निभावून न्यायची, असा प्रश्न अनेक प्राचार्यांना पडला आहे. खर्चाची मर्यादानिवडणूक आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांप्रमाणेच महाविद्यालयांच्या निवडणुकांसाठीही समितीकडून आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. निवडणूक लढविणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निवडणुकीसाठी किती खर्च करायचा, याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही मर्यादा ओलांडणारे विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत.निवडणुकांबाबतच्या महत्त्वपूर्ण शिफारशीमहाविद्यालयाला ४ प्रतिनिधी निवडून द्यावे लागणार.वय वर्षे २५च्या आतील विद्यार्थ्यांनाच निवडणूक लढविता येणार.रिपिटर, एटीकेटीचे विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र ठरणार.राजकीय पक्ष, संघटनांना सहभाग घेता येणार नाही.एकाच दिवशी सर्व महाविद्यालयांमध्ये निवडणूक प्रक्रिया. पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठाच्या विभागांमध्ये निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व महाविद्यालये व विद्यापीठांच्या विभागांना निवडणुका घेणे बंधनकारक आहे.