शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून थक्क व्हाल
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
4
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
5
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
7
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
8
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
9
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
10
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
11
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
12
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
13
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
14
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
15
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी
17
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
18
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
19
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
20
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका

सात महिने उलटल्यानंतरही नाही अपील

By admin | Updated: March 24, 2017 04:28 IST

बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या प्रकरणात चुकीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे तथ्य नसल्याचा अहवाल

पुणे : बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या प्रकरणात चुकीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे तथ्य नसल्याचा अहवाल (सी समरी रिपोर्ट) दिला गेल्याने याप्रकरणी संबंधित न्यायालयात अपील दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आॅगस्ट २०१६मध्ये दिले होते. मात्र, ७ महिने उलटून गेल्यानंतरही या प्रकरणात अपील करण्यात आले नसल्याचे उजेडात आले आहे. अपील न केल्यामुळे पालिकेला १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा व अधिकाऱ्यांना फौजदारी खटल्याला सामोरे जावे लागत आहे.अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी बोगस डॉक्टरविरोधी मोहीम उघडली होती. त्यानुसार धनसिंग चौधरी यांच्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनीही याप्रकरणी तक्रार दिली होती. मात्र, डॉ. दाभोलकर यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा अहवाल पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून न्यायालयात सादर करण्यात आल्याचे गुरुवारी ‘लोकमत’ने उजेडात आणले. पालिकेच्या या असंवेदनशील कारभाराबद्दल अंनिसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.धनसिंग चौधरी यांच्या खटल्यामध्ये आयुक्तांना व बोगस डॉक्टरविरोधी समितीला माहिती न देता सी समरी अहवाल देण्यात आल्याने तो ग्राह्य धरू नये, असे प्रतिज्ञापत्र कुणाल कुमार यांनी उच्च न्यायालयात दिले होते. त्यामुळे याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात पुन्हा अपील करून दाद मागावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले होते. या निर्णयाला ७ महिने उलटले तरी अद्याप अपील दाखल करण्यात आलेले नाही.गणेश बोऱ्हाडे यांनी सांगितले, ‘‘धनसिंग चौधरी यांना सी समरी अहवालामुळे महापालिकेकडून क्लीन चिट मिळाल्याने त्यांनी पालिकेविरुद्ध १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. तसेच चौधरी यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या ७ अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांनी फौजदारी कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपील दाखल केले असते, तर या कारवाईपासून पालिकेची सुटका होऊ शकली असती. मात्र, प्रशासन निष्क्रिय राहिल्याने त्यांना या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.’’ (प्रतिनिधी)