शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

ध्वज फडकवल्याने नऊ महिन्यांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:04 IST

इंग्रज राजवटीचा काळ जुलमी होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकारविरोधी प्रचार केल्याबद्दल, भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना नऊ महिन्यांची सक्तमजुरी व १०० रुपये दंडाची शिक्षा झाली होती.

निरवांगी : इंग्रज राजवटीचा काळ जुलमी होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकारविरोधी प्रचार केल्याबद्दल, भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना नऊ महिन्यांची सक्तमजुरी व १०० रुपये दंडाची शिक्षा झाली होती. दंड न भरण्यास नकार दिल्यामुळे माझ्या घरातील साहित्य जप्त करण्यात आले होते व त्याचा लिलाव करून दंड वसूल केला, असे भारत छोडो आंदोलनात इंग्रजांविरोधात सत्याग्रह केलेले स्वातंत्र्यसैनिक रघुनाथ रामचंद्र माने गुरुजी यांनी सांगितले.कळंब (ता. इंदापूर) येथे ‘भारत छोडो आंदोलनात माझे योगदान’ या विषयावर इतिहास विभागाच्या वतीने महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर यांनी प्रास्ताविक केले.इतिहास विभागाचेप्रमुख प्राध्यापक हमीद उमरअली काझी यांनी स्वतंत्र सैनिक रघुनाथ रामचंद्र माने गुरूजी यांचा परिचय करून दिला.या वेळी माने गुरूजी यांनी इंग्रज राजवटीत आलेले अनुभव सांगितले. हे अनुभव कथन करताना ते अत्यंत भावुक झाले होते. त्याने उपस्थित श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणणारे अनुभव होते.या वेळी प्रा. ज्ञानेश्वर गुळीक व विद्या गुळीक यांनी देशभक्तीपर गीत सादर महाविद्यालयच्या वतीने माने गुरुजी यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हणमंतराव मोरे, खजिनदार हणमंतराव रणसिग, विश्वस्त शिवाजी रणवरे, प्रकाश कदम, वीरसिंह रणसिग, कुलदीप हेगडे कार्यालय अधिक्षक शिवाजी कदम महाविद्यालय प्राध्यापक वर्ग कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी प्रा. हमीद उमरअली काझी व ज्ञानेश्वर गुळीक, विद्या गुळीक यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.देशावर निष्ठा ठेवा; सौजन्याने वागा...आपल्या दैनंदिन कार्याची नोंद ठेवा. कर्ज काढू नका, आपल्या देशावर निष्ठा ठेवा, इतरांशी सौजन्याने वागा, असा संदेश माने गुरुजींनी दिला. भारतमाता की जय, ही घोषणा त्यांनी स्पष्ट व खड्या आवाजात दिली. तेव्हा त्यांना उपस्थितांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने सभागृह दणाणले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस वीरसिंह रणसिंग यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.