शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ध्वज फडकवल्याने नऊ महिन्यांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:04 IST

इंग्रज राजवटीचा काळ जुलमी होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकारविरोधी प्रचार केल्याबद्दल, भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना नऊ महिन्यांची सक्तमजुरी व १०० रुपये दंडाची शिक्षा झाली होती.

निरवांगी : इंग्रज राजवटीचा काळ जुलमी होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकारविरोधी प्रचार केल्याबद्दल, भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना नऊ महिन्यांची सक्तमजुरी व १०० रुपये दंडाची शिक्षा झाली होती. दंड न भरण्यास नकार दिल्यामुळे माझ्या घरातील साहित्य जप्त करण्यात आले होते व त्याचा लिलाव करून दंड वसूल केला, असे भारत छोडो आंदोलनात इंग्रजांविरोधात सत्याग्रह केलेले स्वातंत्र्यसैनिक रघुनाथ रामचंद्र माने गुरुजी यांनी सांगितले.कळंब (ता. इंदापूर) येथे ‘भारत छोडो आंदोलनात माझे योगदान’ या विषयावर इतिहास विभागाच्या वतीने महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर यांनी प्रास्ताविक केले.इतिहास विभागाचेप्रमुख प्राध्यापक हमीद उमरअली काझी यांनी स्वतंत्र सैनिक रघुनाथ रामचंद्र माने गुरूजी यांचा परिचय करून दिला.या वेळी माने गुरूजी यांनी इंग्रज राजवटीत आलेले अनुभव सांगितले. हे अनुभव कथन करताना ते अत्यंत भावुक झाले होते. त्याने उपस्थित श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणणारे अनुभव होते.या वेळी प्रा. ज्ञानेश्वर गुळीक व विद्या गुळीक यांनी देशभक्तीपर गीत सादर महाविद्यालयच्या वतीने माने गुरुजी यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हणमंतराव मोरे, खजिनदार हणमंतराव रणसिग, विश्वस्त शिवाजी रणवरे, प्रकाश कदम, वीरसिंह रणसिग, कुलदीप हेगडे कार्यालय अधिक्षक शिवाजी कदम महाविद्यालय प्राध्यापक वर्ग कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी प्रा. हमीद उमरअली काझी व ज्ञानेश्वर गुळीक, विद्या गुळीक यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.देशावर निष्ठा ठेवा; सौजन्याने वागा...आपल्या दैनंदिन कार्याची नोंद ठेवा. कर्ज काढू नका, आपल्या देशावर निष्ठा ठेवा, इतरांशी सौजन्याने वागा, असा संदेश माने गुरुजींनी दिला. भारतमाता की जय, ही घोषणा त्यांनी स्पष्ट व खड्या आवाजात दिली. तेव्हा त्यांना उपस्थितांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने सभागृह दणाणले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस वीरसिंह रणसिंग यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.