शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

ध्वज फडकवल्याने नऊ महिन्यांची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:04 IST

इंग्रज राजवटीचा काळ जुलमी होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकारविरोधी प्रचार केल्याबद्दल, भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना नऊ महिन्यांची सक्तमजुरी व १०० रुपये दंडाची शिक्षा झाली होती.

निरवांगी : इंग्रज राजवटीचा काळ जुलमी होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिश सरकारविरोधी प्रचार केल्याबद्दल, भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांना नऊ महिन्यांची सक्तमजुरी व १०० रुपये दंडाची शिक्षा झाली होती. दंड न भरण्यास नकार दिल्यामुळे माझ्या घरातील साहित्य जप्त करण्यात आले होते व त्याचा लिलाव करून दंड वसूल केला, असे भारत छोडो आंदोलनात इंग्रजांविरोधात सत्याग्रह केलेले स्वातंत्र्यसैनिक रघुनाथ रामचंद्र माने गुरुजी यांनी सांगितले.कळंब (ता. इंदापूर) येथे ‘भारत छोडो आंदोलनात माझे योगदान’ या विषयावर इतिहास विभागाच्या वतीने महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर यांनी प्रास्ताविक केले.इतिहास विभागाचेप्रमुख प्राध्यापक हमीद उमरअली काझी यांनी स्वतंत्र सैनिक रघुनाथ रामचंद्र माने गुरूजी यांचा परिचय करून दिला.या वेळी माने गुरूजी यांनी इंग्रज राजवटीत आलेले अनुभव सांगितले. हे अनुभव कथन करताना ते अत्यंत भावुक झाले होते. त्याने उपस्थित श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणणारे अनुभव होते.या वेळी प्रा. ज्ञानेश्वर गुळीक व विद्या गुळीक यांनी देशभक्तीपर गीत सादर महाविद्यालयच्या वतीने माने गुरुजी यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हणमंतराव मोरे, खजिनदार हणमंतराव रणसिग, विश्वस्त शिवाजी रणवरे, प्रकाश कदम, वीरसिंह रणसिग, कुलदीप हेगडे कार्यालय अधिक्षक शिवाजी कदम महाविद्यालय प्राध्यापक वर्ग कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी प्रा. हमीद उमरअली काझी व ज्ञानेश्वर गुळीक, विद्या गुळीक यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.देशावर निष्ठा ठेवा; सौजन्याने वागा...आपल्या दैनंदिन कार्याची नोंद ठेवा. कर्ज काढू नका, आपल्या देशावर निष्ठा ठेवा, इतरांशी सौजन्याने वागा, असा संदेश माने गुरुजींनी दिला. भारतमाता की जय, ही घोषणा त्यांनी स्पष्ट व खड्या आवाजात दिली. तेव्हा त्यांना उपस्थितांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने सभागृह दणाणले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस वीरसिंह रणसिंग यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.