शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

निमगाव केतकी ग्रामीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST

निमगाव केतकी: वाढता उन्हाळा त्यातच ग्रामीण रुग्णालयाच्या विंधनविहिरीवरील विद्युतपंप जळाल्यामुळे गेल्या ८ ते १० दिवसांपासून रुग्णालयासह वसाहतीमधील पाण्याच्या ...

निमगाव केतकी: वाढता उन्हाळा त्यातच ग्रामीण रुग्णालयाच्या विंधनविहिरीवरील विद्युतपंप जळाल्यामुळे गेल्या ८ ते १० दिवसांपासून रुग्णालयासह वसाहतीमधील पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या महामारीत आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची बाजी लावून समाजहिताचे काम करत आहे. पण, त्यांनाच त्यांचे आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी साधे पाणीही पुरेसे मिळत नसल्याने नक्की सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था काय करत आहे, असा प्रश्न निर्माण होतो.

निमगाव केतकी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी पुरेसे मिळत नसल्यामुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे निवासी कर्मचारी सिस्टर यांनी सांगितले. ही पाणी गैरसोय पाहून जन प्रहार संघटने तालुकाध्यक्ष संजय राऊत यांनी पाणी टँकर पुरवून गैरसोय दूर केली. या वेळी प्रथम निमगाव केतकीचे ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत जगताप यांना भ्रमणदूरध्वनीवरून आरोग्य कर्मचारी वसाहत व ग्रामीण रुग्णालयातील पाण्याच्या गैरसोईबाबत विचारणा केली,त्यावर ते आमच्याकडे नसून ग्रामीण रुग्णालय बघेल असे त्यांनी उत्तर दिले. तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा संपर्क होऊ शकला नाही.

पाणीपुरवठा सोयीबाबत प्रहार संघटनेने डॉ. एकनाथ चंदनशिवे व डॉ. मिलिंद खाडे यांनी तहसीलदार अनिल ठोंबरे यांचेकडे तक्रार केली.त्याची दखल घेत सरपंच व ग्रामसेवक यांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत ग्रामपंचायतीने पाणी टँकरने द्या, अशी सूचना तहसीलदार ठोंबरे यांनी दिल्या. ते मान्य करत सरपंच डोंगरे यांनी ग्रामसेवक जगताप यांना सूचना पाणीपुरवठा करण्यास सांगितले. या वेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सोमनाथ राऊत, अ‍ॅड. सचिन राऊत, गणेश घाडगे, बेबा डोंगरे आदी उपस्थित होते.

निमगाव केतकी येथे आरोग्य कर्मचारी वसाहत व रुग्णालयास टँकरने पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करताना प्रहारचे पदाधिकारी आणि आरोग्य कर्मचारी.

०८०५२०२१ बारामती—०१