शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ती काळरात्रच - १२ जुलै १९६१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:08 IST

प्रलयासारख्या महाभयंकर नदीचे हे रौद्र रूप न विसरण्यासारखे आहे पुणेकरांकरिता. एक ना अनेक असे साथीचे रोग वाढण्याची पण भीती ...

प्रलयासारख्या महाभयंकर नदीचे हे रौद्र रूप न विसरण्यासारखे आहे पुणेकरांकरिता. एक ना अनेक असे साथीचे रोग वाढण्याची पण भीती ह्या वेळेस होती. त्यासोबत पुणेकरांना परत शुद्ध पाणीपुरवठा करणे हेही तितकेच गरजेचे होते. हा प्रमुख प्रश्न त्या वेळी पुणे महानगरपालिकेसमोर होता. या काळात माझे आजोबा कै. उमाकांत जगन्नाथ महाशब्दे वॉटर सप्लाय डिपार्टमेंटमध्ये काम पाहत होते. त्यांनी पुणे कॉपोर्रेशनमध्ये १९४९ ते १९७५ ह्या कालावधीत पाणीपुरवठ्याचे काम पहिले.

१९६१ साली जेव्हा पूर आला तेव्हा पुण्याला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतले आणि त्या परिस्थितीतसुद्धा पुणेकरांना शुद्ध पाणी मिळायला लागले. त्या काळच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना विशेष रेल्वेचा पास देऊन मंत्रालयात बोलवून घेतले होते. त्याकाळी आजच्याप्रमाणे प्रगत तंत्रज्ञान नव्हते. त्यांना मंत्रालयातून तार पाठवून बोलाविण्यात आले होते. विरोधी पक्षातले लोक आरोप-प्रत्यारोप करत होते तेव्हा उमाकांत महाशब्दे (आजोबा) तिथे उपस्थित झाले. माननीयांनी प्रश्न विचारताच त्यांना सक्षम उत्तर द्यायला माझे आजोबा तयार होते. विरोधकांना हवी असलेली उत्तरे त्यांना आजोबांच्या तिथल्या उपस्थितीमुळेच मिळाली, असे आजोबांनी पानशेत आठवणी सांगताना मला सांगितले.

माझ्या आजोबांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात योगदान दिले. नुसते सुरळीत नाही तर शुद्ध पाणी पुणेकरांना देण्याचे मोठे काम केले. त्यामुळे पुढील रोगराई झाली नाही.

आज या घटनेला ६० वर्षे पूर्ण होत असताना पुन्हा त्या सर्व गोष्टी मी जणू आजोबांकडून ताजेतवाने होऊन ऐकतोय, असे जाणवत आहे.

- शैलेश जगदीश महाशब्दे (नातू)