शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ती काळरात्रच - १२ जुलै १९६१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:08 IST

प्रलयासारख्या महाभयंकर नदीचे हे रौद्र रूप न विसरण्यासारखे आहे पुणेकरांकरिता. एक ना अनेक असे साथीचे रोग वाढण्याची पण भीती ...

प्रलयासारख्या महाभयंकर नदीचे हे रौद्र रूप न विसरण्यासारखे आहे पुणेकरांकरिता. एक ना अनेक असे साथीचे रोग वाढण्याची पण भीती ह्या वेळेस होती. त्यासोबत पुणेकरांना परत शुद्ध पाणीपुरवठा करणे हेही तितकेच गरजेचे होते. हा प्रमुख प्रश्न त्या वेळी पुणे महानगरपालिकेसमोर होता. या काळात माझे आजोबा कै. उमाकांत जगन्नाथ महाशब्दे वॉटर सप्लाय डिपार्टमेंटमध्ये काम पाहत होते. त्यांनी पुणे कॉपोर्रेशनमध्ये १९४९ ते १९७५ ह्या कालावधीत पाणीपुरवठ्याचे काम पहिले.

१९६१ साली जेव्हा पूर आला तेव्हा पुण्याला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतले आणि त्या परिस्थितीतसुद्धा पुणेकरांना शुद्ध पाणी मिळायला लागले. त्या काळच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना विशेष रेल्वेचा पास देऊन मंत्रालयात बोलवून घेतले होते. त्याकाळी आजच्याप्रमाणे प्रगत तंत्रज्ञान नव्हते. त्यांना मंत्रालयातून तार पाठवून बोलाविण्यात आले होते. विरोधी पक्षातले लोक आरोप-प्रत्यारोप करत होते तेव्हा उमाकांत महाशब्दे (आजोबा) तिथे उपस्थित झाले. माननीयांनी प्रश्न विचारताच त्यांना सक्षम उत्तर द्यायला माझे आजोबा तयार होते. विरोधकांना हवी असलेली उत्तरे त्यांना आजोबांच्या तिथल्या उपस्थितीमुळेच मिळाली, असे आजोबांनी पानशेत आठवणी सांगताना मला सांगितले.

माझ्या आजोबांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात योगदान दिले. नुसते सुरळीत नाही तर शुद्ध पाणी पुणेकरांना देण्याचे मोठे काम केले. त्यामुळे पुढील रोगराई झाली नाही.

आज या घटनेला ६० वर्षे पूर्ण होत असताना पुन्हा त्या सर्व गोष्टी मी जणू आजोबांकडून ताजेतवाने होऊन ऐकतोय, असे जाणवत आहे.

- शैलेश जगदीश महाशब्दे (नातू)