शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

‘स्वयंसेवी संस्थांनी स्मारकाचे जतन करावे’

By admin | Updated: December 21, 2015 00:29 IST

शहरात अनेक महापुरुषांच्या मूर्ती, पुतळे आणि स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात आणि नावलौकिकात भर पडते. मात्र, जयंती आणि पुण्यतिथी सोडल्यास वर्षभर या पुतळ्याकडे कोणी लक्ष देत नाही.

 शहरात अनेक महापुरुषांच्या मूर्ती, पुतळे आणि स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात आणि नावलौकिकात भर पडते. मात्र, जयंती आणि पुण्यतिथी सोडल्यास वर्षभर या पुतळ्याकडे कोणी लक्ष देत नाही. या स्मारक आणि पुतळ्याची जबाबदारी शहरातील सामाजिक संस्था आणि संघटनांनी घ्यावी, अशी मागणी शिवराज्य संघटनेचे अध्यक्ष अजय जाधव यांनी महापालिकेकडे केली आहे. मूर्ती, पुतळे आणि स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. शहरातील तसेच, बाहेरील नागरिक या स्मारकांना आवर्जून भेट देतात. मात्र, महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी वगळता इतर दिवशी या स्मारकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. वर्षभर या ठिकाणी लाजिरवाणी परिस्थिती असते. अनेक घटकांनी महापुरुषांची जातीपातींत, प्रांताप्रातांत व पक्ष-संघटनांमध्ये वाटणी करून टाकली आहे. सर्व समाज संघटित करण्याचा त्यांच्या जीवन उद्देशालाच आपण विसरलो असल्याचे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. या स्मारकांची जबाबदारी शहरातील सामाजिक संस्था आणि संघटनांनी घ्यावी. स्मारकांची आठवड्यातून एकदा स्वच्छता करावी. सुशोभीकरण करावे. महापुरुषांच्या विचारांचा जागर घडवून आणण्यासाठी चित्र प्रदर्शन, व्याख्याने, दीपोत्सव, पोवाडा, चरित्र कथाकथन, शिववंदना आदी उपक्रम राबवावेत, असे त्यांनी नमूद केले आहे. संघटनेतर्फे संभाजीनगर, चिंचवड येथील बर्ड व्हॅलीतील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन नियमितपणे केले जाते. महिन्यातून एकदा मूर्तीची स्वच्छता करून शिववंदना होते. व्याख्याने, दीपोत्सव, पोवाडा, चरित्र कथाकथन, मर्दानी खेळ आदी उपक्रम शहरातील सार्वजनिक मंडळ, संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेतले जातात. याच पद्धतीने स्मारकाची स्वच्छता आणि देखभाल करण्याची जबाबदारी प्रत्येक स्वयंसेवी संघटनांनी घ्यावी. यामुळे पुतळ्यांची विटंबनेवरून दंगली भडकण्याची वेळ येणार नाही. यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)