शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पुढील आठ दिवस शहरासाठी ‘आत्यंतिक कसोटी’चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:09 IST

डॉ. संजय ललवाणी : पुण्यातील साथीचा सध्या ''पीक'' प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या पुण्यात दररोज ४ ...

डॉ. संजय ललवाणी : पुण्यातील साथीचा सध्या ''पीक''

प्रज्ञा केळकर-सिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्या पुण्यात दररोज ४ हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ८ हजारांचा आकडा ओलांडून पुढे गेली आहे. सध्या पुण्यातील कोरोना संसर्गाचा आलेख सर्वोच्च बिंदूवर असून पुढील आठ दिवसांचा कालावधी शहरासाठी ''आत्यंतिक कसोटी''चा असणार आहे, असे भाकीत भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी केले.

साधारणपणे १८ मार्चनंतर शहरातील लोकसंख्या ४ हजारांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज डॉ. ललवाणी यांनी १२ मार्च रोजी व्यक्त केला होता. तो अंदाज तंतोतंत खरा ठरला. पुणे पहिल्यापासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. पुण्यातील रुग्णवाढीचा वेग खूप जास्त आहे. सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुढील रविवारपर्यंत रुग्णसंख्या आणखी मोठा पल्ला गाठेल. त्यामुळेच हे आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे भाष्य त्यांनी केले. पुण्यातील आरोग्य व्यवस्था वेगाने काम करत असल्याने आठवड्याभरात प्रसारावर नियंत्रण मिळवता येईल.

ललवाणी म्हणाले, ''सध्या एकूण रुग्णसंख्येपैकी १० टक्के लोकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे आणि त्यातील १० टक्के लोकांना आयसीयूची गरज भासत आहे. लॉकडाऊन न केल्यास रुग्णसंख्येवर आपले कोणतेच नियंत्रण राहणार नाही. आताच्या मिनी लॉकडाऊनचा ३०-४० टक्के परिणाम दोन आठवड्यांनी पाहायला मिळेल. सुरुवातीच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांकडून प्रसार होत होता. आता कुटुंबे, संपूर्ण सोसायटी ''पॉझिटिव्ह'' होताना दिसत आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनने तो प्रसार कसा थांबवणार, हे पहावे लागेल. पार्शियल लॉकडाऊन साथ दिवसांपेक्षा जास्त वाढवता येणार नाही. कारण, लोक पुन्हा आपापल्या गावी परतू लागल्यास अर्थचक्र पुन्हा बिघडेल. त्यामुळे सध्या शासनाने लसीकरणावर भर देणे आणि नागरिकांनी आपणहून लसीकरणासाठी पुढे येणे आवश्यक आहे.''

-----

काय असेल मृत्यूदराची स्थिती?

सध्याची परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाने २९५ लोकांचा मृत्यू झाला. पुढील दोन दिवसांत मृत्यूचा आकडा ७००-८०० पर्यंत जाऊ शकतो. पुढील आठवड्यात मृत्यूची संख्या १००० पर्यंत जाऊ शकते. लॉकडाऊनचा परिणाम दोन आठवड्यानी दिसू लागेल आणि मृत्युदर कमी होईल.

१५ एप्रिल ते ३१ मे हा कालावधी भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.

-----

12 एप्रिलपर्यंतचा प्रशासकीय अंदाज

– ऑक्सिजन विरहित फक्त 9 बेड्स शिल्लक राहतील

– 3207 ऑक्सिजन बेडची कमतरता भासेल

– 462 आयसीयु बेड शिल्लक राहतील

– 647 व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल