शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

नवीन गावांचा महापालिकेवर पडेल भार

By admin | Updated: May 29, 2017 03:09 IST

ज्या भागाला मूलभूत सुविधा मिळाल्या आहेत, त्या भागाची आता विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या विकसनशील

लोकमत न्यूज नेटवर्कहडपसर : ज्या भागाला मूलभूत सुविधा मिळाल्या आहेत, त्या भागाची आता विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या विकसनशील भागातील लोकांना नवीन गावाची स्वतंत्र महापालिका व्हावी, अशी इच्छा आहे. नवीन गावे समाविष्ट करून पुणे महापालिकेवर जादा बोजा पडेल. सध्या महापालिकेतअसलेल्या नागरिकांचा विकास होत असताना नवीन गावाच्या सोयी-सुविधांचा भार नको आहे.हडपसर व इतर काही उपनगरांमधील काही लोकांना नवीन महापालिका नको आहे. पुणे महापालिकेकडून मूलभूत सोयी-सुविधा मिळाल्या आहेत. पुण्यातीलही नागरिकांना सोयी-सुविधा मिळालेल्या आहेत. आतापर्यंत मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी खर्च होत होता. आता कोठे विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नवनवीन प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. येथील जटिल समस्या व प्रकल्प उभारणीसाठी दरवर्षीच्या पालिकेच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली जात आहे. अजून विकास पूर्ण झाला नाही. हा विकास सुरू असताना नवीन गावांना सोयी-सुविधा देण्यासाठी येथील विकास खुंटला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यापेक्षा स्वतंत्र महापालिका केल्यास नवीन महापालिकेचा व सध्या विकसित होणाऱ्या भागाचा स्वतंत्र विकास होईल, अशी अपेक्षा सध्या महापालिकेतील नागरिकांची आहे.विकसनशील परिसराच्या विकासावर परिणाम हडपसर, खराडी, मुंढवा, महंमदवाडी, येरवडा अशा उपनगरांतील मूलभूत सुविधा पुणे महापालिकेकडून पूर्णत्वाकडे नेल्या जात आहेत. आता या परिसरात हॉस्पिटल, उद्यान, क्रीडांगण, भाजीमंडई अशा प्रकल्पाची उभारणी होऊन विकास साधण्याचे काम महापालिका करीत आहे, तर ग्रामपंचायतीचा समावेश केल्यास त्याचा भार पालिकेवर पडेल. विकसनशील परिसराच्या विकासावर परिणाम होईल. यापेक्षा नवीन महापालिका होणे या गावांच्या दृष्टीने जसे महत्त्वाचे आहे, तसे पालिकेतील विकसनशील भागातील नागरिकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे.नवीन गावांचा विकास नियोजनबद्ध होईल. त्यासाठी वेगळा निधी राज्यशासन देईलही. मात्र पुणे महापालिकेचा निधीही तिकडे वापरला जाऊ शकतो. त्यामुळे आमच्या परिसराचा विकास खुंटण्याची भीती वाटते.- सुरेश साबळे, नोकरदारउपनगरातील नवीन प्रकल्पासाठी मोठ्या निधीची तरतूद केली जात आहे. मात्र दरवर्षीच्या अंदाजपत्रकात थोडा थोडा निधी टाकला जात आहे. यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यास बराच कालावधी जात आहे. अशात नवीन परिसराचा बोजा पडल्यास हे प्रकल्प आणखी लांबणीवर पडतील.- आनंद काळे, व्यावसायिकनवीन गावाची स्वतंत्र महापालिकेने स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करता येईल. राज्यशासनाकडून मिळणारा निधी हा पूर्णपणे नव्या महापालिकेच्या बांधणीत वापरता येईल. त्यामुळे त्या निधीत पुणे महापालिकेचा वाटा नको, म्हणून गावच्या भवितव्यासाठी स्वतंत्र पालिका गरजेची आहे.- सुखदेव पाटील, ग्रामस्थ, फुरसुंगी