शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

आठवलेंची नवी कविता... ‘जे रोज देतात टोले, त्यांना म्हणतात...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले शुक्रवारी (दि.१६) पुण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले शुक्रवारी (दि.१६) पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या नव्या शीघ्र कविता ऐकवल्या.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीपण्णी करताना आठवले म्हणाले, “जब तक है केंद्र मे नरेंद्र मोदी, तब तक कैसे पंतप्रधान बनेंगे राहुल गांधी.’ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मात्र आठवले यांनी कौतुक केले. पटोलेंचे वर्णन करताना आठवले म्हणाले, “जे रोज देतात इतरांना टोले, त्यांना म्हणतात नाना पटोले.”

कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आठवले यांनी दिलेल्या ‘गो कोरोना...’ची खूप चर्चा झाली. त्यात बदल करून आठवले यांनी नवी घोषणा दिली. ते म्हणाले, “मी ‘गो कोरोना’चा नारा दिला. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून आला. आता ‘नो कोरोना, नो कोरोना’चा नारा मी देत आहे.” पुढे त्यांनी ‘जरी आली कोरोनाची तिसरी लाट, तर आम्ही लावू त्याची वाट,’ अशीही कविता केली.

चौकट

रामदास आठवले म्हणतात...

-पालिका हद्दीत २३ गावांचा समावेश केल्याने शहराचे क्षेत्र वाढले. त्याऐवजी दुसरी महापालिका करावी. राज्य‌ सरकारने पुण्यासाठी साडेचार एफएसआय द्यावा. जेणेकरून बिल्डर एसआरएसाठी पुढे येतील आणि झोपडपट्टी धारकांना फायदा मिळेल.

-पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करू नये. देशातील सर्व जाती धर्मांचा विचार करून मंत्रिमंडळात नेत्यांना स्थान दिले गेले आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचा नंबर लागला नाही. पंकजा या भाजपमध्येच राहतील यात शंका नाही.

-एल्गार परिषद व भीमा कोरेगाव दंगल याचा काहीही‌ संबंध नाही. एल्गार परिषदेतील भाषणांमुळे नक्षलवाद वाढू नये म्हणून संशयितांवर कारवाई सुरू आहे. जे आंबेडकरवादी आहेत; ते नक्षलवादी विचाराचे असू‌ शकत नाहीत.

चौकट

आंबेडकरांमुळे मिळत नाही यश

“प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे रिपाइंचे आमदार व खासदार निवडून येत नाहीत. कोण्याही एकट्याला‌ सध्या यश मिळत नाही. त्यामुळे आम्ही भाजपसोबत आहोत,” असे रामदास आठवले यांनी सांगितले.