शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आठवलेंची नवी कविता... ‘जे रोज देतात टोले, त्यांना म्हणतात...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले शुक्रवारी (दि.१६) पुण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले शुक्रवारी (दि.१६) पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या नव्या शीघ्र कविता ऐकवल्या.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीपण्णी करताना आठवले म्हणाले, “जब तक है केंद्र मे नरेंद्र मोदी, तब तक कैसे पंतप्रधान बनेंगे राहुल गांधी.’ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मात्र आठवले यांनी कौतुक केले. पटोलेंचे वर्णन करताना आठवले म्हणाले, “जे रोज देतात इतरांना टोले, त्यांना म्हणतात नाना पटोले.”

कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आठवले यांनी दिलेल्या ‘गो कोरोना...’ची खूप चर्चा झाली. त्यात बदल करून आठवले यांनी नवी घोषणा दिली. ते म्हणाले, “मी ‘गो कोरोना’चा नारा दिला. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून आला. आता ‘नो कोरोना, नो कोरोना’चा नारा मी देत आहे.” पुढे त्यांनी ‘जरी आली कोरोनाची तिसरी लाट, तर आम्ही लावू त्याची वाट,’ अशीही कविता केली.

चौकट

रामदास आठवले म्हणतात...

-पालिका हद्दीत २३ गावांचा समावेश केल्याने शहराचे क्षेत्र वाढले. त्याऐवजी दुसरी महापालिका करावी. राज्य‌ सरकारने पुण्यासाठी साडेचार एफएसआय द्यावा. जेणेकरून बिल्डर एसआरएसाठी पुढे येतील आणि झोपडपट्टी धारकांना फायदा मिळेल.

-पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करू नये. देशातील सर्व जाती धर्मांचा विचार करून मंत्रिमंडळात नेत्यांना स्थान दिले गेले आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचा नंबर लागला नाही. पंकजा या भाजपमध्येच राहतील यात शंका नाही.

-एल्गार परिषद व भीमा कोरेगाव दंगल याचा काहीही‌ संबंध नाही. एल्गार परिषदेतील भाषणांमुळे नक्षलवाद वाढू नये म्हणून संशयितांवर कारवाई सुरू आहे. जे आंबेडकरवादी आहेत; ते नक्षलवादी विचाराचे असू‌ शकत नाहीत.

चौकट

आंबेडकरांमुळे मिळत नाही यश

“प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे रिपाइंचे आमदार व खासदार निवडून येत नाहीत. कोण्याही एकट्याला‌ सध्या यश मिळत नाही. त्यामुळे आम्ही भाजपसोबत आहोत,” असे रामदास आठवले यांनी सांगितले.