शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

आदिवासींच्या उमलत्या भविष्यापुढे निव्वळ अंधकार

By admin | Updated: October 7, 2016 03:49 IST

काट्याकुट्यात किंवा रानावनात राहायचं... रानातील काटेरी झाडं तोडून त्यापासून कोळसा बनवायचा... त्यातून मिळणाऱ्या तोकड्या उत्पन्नावर गुजराण करायची...

सुरेश निडबने /वालचंदनगरकाट्याकुट्यात किंवा रानावनात राहायचं... रानातील काटेरी झाडं तोडून त्यापासून कोळसा बनवायचा... त्यातून मिळणाऱ्या तोकड्या उत्पन्नावर गुजराण करायची... जगण्याची कोणतीच नवी दिशा नाही. त्यामुळे कोळशासारखाच काळाकुट्ट अंधार कायमच समोर दाटलेला. तर आपल्या आई-बापाचा हात धरून रानोमाळ फिरणाऱ्या उमलत्या भविष्यांचासुद्धा आता कोळसाच झाला आहे. वालचंदनगर, कळंब परिसरातील नीरा नदीच्या कडेने शेकडो आदिवासी कुटुंबे आणि त्यांची मुले आज आपले भविष्य शोधत आहेत. वालचंदनगर परिसरातील कोळसा तयार करण्यासाठी आलेली ही कुटुंबे जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून या आदिवासींचे सर्वेक्षण झालेलेच नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याही गावात सामावून घेतले गेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांचा विचार करण्यास शासनस्तरावरही कोणाकडे वेळ नाही. मुळात हे आदिवासी या भागात राहायला आहेत की नाही, याची कल्पनाही शासनदरबारी नाही. मग मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तर खूप लांबचा आहे, अशी व्यथा येथील बबन रामभाऊ पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. देशातील गोरगरीब अन्नविना उपाशी राहू नये. त्याला पोटभर अन्न मिळावे, यासाठी केंद्र शासनाने मागील काही वर्षांपूर्वी अन्नसुरक्षा कायदा आणला. मात्र, या आदिवासींकडे रेशनकार्डच नसल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानातील सवलतीमध्ये धान्य मिळत नाही. ४या आदिवासी कुटुंबाच्या पिढ्यान्पिढ्या अठराविश्वे दारिद्र्यात गेल्या आहेत. बबनने सांगितले, की आम्हाला ना घरदार, ना हाताला काम. त्यामुळे सरपण तोडून वाटा काढत कोळसा बनवून कुटुंब सांभाळावे लागते. ४आम्हा आदिवासींना सरकारच्या कोणत्याही सुविधा नाही. त्यामुळेच आदिवासीच म्हणून भटकंती करीत आहोत. मुलांना शाळेत पाठवण्याची इच्छा आहे; परंतु भाकरी मिळवण्यासाठी भटकंती करावी लागते. ४एकीकडे शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी स्पर्धा लागते. त्यासाठी शिक्षकांची पळता भुई थोडी होते. मात्र येथील आदिवासी पाड्यावर शेकडो मुले रानावनात भटकंती करत आहेत. सर्वशिक्षा अभियान येथे अजूनही पोहोचले नाही.