शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

भिकारीमुक्त मोहिमेकडे पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 05:42 IST

गेल्या वर्षभरात राज्यात १,५३९, तर पुणे शहरात केवळ १०८ भिका-यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या महिला व बाल विकास विभागातर्फे राबविलेल्या जात असलेल्या ‘महाराष्ट्र भिकारीमुक्त

राहुल शिंदेपुणे : गेल्या वर्षभरात राज्यात १,५३९, तर पुणे शहरात केवळ १०८ भिका-यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या महिला व बाल विकास विभागातर्फे राबविलेल्या जात असलेल्या ‘महाराष्ट्र भिकारीमुक्त अभियाना’स पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, ‘भिकारी’ या प्रश्नाकडे सामाजिक समस्या म्हणून पाहून ती समस्या दूर करण्यासाठी सर्व समाजाने व पोलिसांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा महिला व बालविकास विभागाच्या अधिकाºयांकडून केली जात आहे.पुण्यासह राज्यभरात लहान मुलांची चोरी करून त्यांना भीक मागण्यास लावण्याच्या घटना समोर येत आहेत. तसेच, शहरातील प्रत्येक मोठ्या सिग्नल जवळ लहान मुले व तरुण व वृद्ध भीक मागताना दिसतात. दिवसेंदिवस भीक मागणाºयांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळेच राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आणि धर्मादाय कार्यालयाच्या सहकार्याने भिकारीमुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनातर्फे १५ आॅगस्ट २०१७ ते २६ जानेवारी २०१८ या कालावधीत ‘महाराष्ट्र भिकारीमुक्त अभियान योजना’ राबविली जात असून, तिला २६ जानेवारी २०१८ पासून पुढे आणखी ६ महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.‘भिक्षा प्रतिबंधक कायदा १९५८’ महाराष्ट्रात सर्वप्रथम लागू करण्यात आला. त्यानंतर देशातील इतर राज्यांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली.भीक मागणे आणि भीक देणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी भीक मागणाºयांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु, अनेक वर्षांपासून प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. गृह विभागाने गांभीर्याने घ्यावे, अशी अपेक्षा महिला व बाल विकास विभागाच्या भिक्षा प्रतिबंधक शाखेच्या सहायक आयुक्त सुवर्णा पवार यांनी व्यक्त केली.पुण्यातील कारवाईशहरातील विविध ठिकाणी भीक मागणाºयांची संख्या मोठी दिसून येत असली, तरी २०१७ या वर्षात केवळ १०८ भिकाºयांवर कारवाई करण्यात आली. त्यात ८६ तरुण व वृद्धांचा, तर २२ लहान मुलांचा समावेश आहे. या लहान मुलांमध्ये १० मुले व १२ मुलींवर भीक मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.गेल्या सहा महिन्यांत भिक्षेकरी स्वीकार गृहात दाखल झालेल्या भिकाºयांची आकडेवारीस्वीकार केंद्राचे नाव अटक भिक्षेकरी जामिनावर सुटका संस्थेतील दाखलपुरुष भिक्षेकरी स्वीकार केंद्र, चेंबूर १,१३० १,१०८ २२महिला भिक्षेकरी स्वीकार केंद्र, चेंबूर १७५ १६१ १४शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्र, येरवडा ११९ ८८ १६शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्र, साता ०२ ०० ०२शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्र, विसापूर, अ.नगर १७ १२ ०५पुरुष भिक्षेकरी स्वीकार केंद्र, नागपूर, ४५ २९ १६महिला भिक्षेकरी स्वीकार केंद्र, नागपूर, ३४ २८ ०६महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, औरंगाबाद ०९ ०१ ०८एकूण १५३९ १४३१ ८७सार्वजनिक ठिकाणी भीक मागणे, देणे व घेणे गुन्हा आहे, हे माहीत असूनही भिकाºयांच्या माध्यमातून समाजात आळशी प्रवृत्ती जागृत ठेवली जात आहे. तसेच, अनेकांना त्यांचा सन्मान विकून भीक मागण्यास लावले जात आहे. पोलिसांना हा सर्व प्रकार दिसत असूनही त्यांच्याकडून भिकाºयांवर कारवाई करण्याबाबत दुर्लक्ष केले जाते. गृह विभागासमोर अनेक प्रश्न आहेत; परंतु त्यांनी भिकाºयांवर कारवाई करण्याचा प्राधान्यांने विचार केला पाहिजे.- सुवर्णा पवार,आयुक्त, भिक्षा प्रतिबंधक शाखा