शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

नीरा देवघर-भाटघर पाणीसाठ्यात घट

By admin | Updated: May 12, 2014 03:30 IST

या वर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे पूर्व भागातील पाणीटंचाईमुळे बारामती, इंदापूर, अकलूज यांच्यासह इतर भागाला भोर तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर धरणातून पाणी नीरा नदीत सोडले आहे.

भोर : या वर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे पूर्व भागातील पाणीटंचाईमुळे बारामती, इंदापूर, अकलूज यांच्यासह इतर भागाला भोर तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर धरणातून पाणी नीरा नदीत सोडले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठा कमी-कमी होतोय. त्यामुळे दोन्ही धरणभागांतील गावात पाणीटंचाई वाढत आहे. नीरा देवघर धरणात ३० टक्के ३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, तर भाटघर धरणात ८.५९ टक्के २ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मागील वर्षी दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. मागच्या तुलनेत या वेळी धरणाचा पाणीसाठ्यात घट झाली आहे. वीर धरणात ३४.४३ टक्के ३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. शिवाय भोरमधील तिन्ही धरणांचे पाणी नदीद्वारे वीर धरणात जात आहे. भाटघर धरणातील वीजनिर्मिती केंद्र डिसेंबरला सुरू झाले. दोन महिन्यांत पाण्याअभावी बंद आहे. नीरा देवघर धरणावरील वीजनिर्मिती केंद्र आॅक्टोबरला सुरू झाले, त्यात अजून १५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. भाटघरला १६ तर नीरा देवघरला ६ मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते. पूर्वभागातील पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून या वेळी दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली सोडले आहे. यामुळे पूर्व भागाची तहान भागत असली तरी भोरमधील धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने नीरा देवघर व भाटघर धरण भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत धरणात पाणीसाठा अत्यंत कमी आहे. विशेषत: भाटघर धरणात २४ पैकी फक्त २ टीएमसी पाणीसाठाच शिल्लक आहे. त्यातही निम्मा गाळ आहे. अद्यापही धरणातून पाणी सुरू राहिल्यास अत्यल्प पाणीसाठा राहून धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. धरणाच्या पाण्यावर अनेक नळपाणीपुरवठा योजना आहेत. धरणाचे पाणी कमी झाल्यावर विहिरींनाही पाणी कमी पडते आणि टंचाई भासते. त्यामुळे भाटघर धरणातील पाणी सोडणे बंद करायला हवे, अशी मागणी होत आहे.