शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

नीरा देवघर-भाटघर पाणीसाठ्यात घट

By admin | Updated: May 12, 2014 03:30 IST

या वर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे पूर्व भागातील पाणीटंचाईमुळे बारामती, इंदापूर, अकलूज यांच्यासह इतर भागाला भोर तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर धरणातून पाणी नीरा नदीत सोडले आहे.

भोर : या वर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे पूर्व भागातील पाणीटंचाईमुळे बारामती, इंदापूर, अकलूज यांच्यासह इतर भागाला भोर तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर धरणातून पाणी नीरा नदीत सोडले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठा कमी-कमी होतोय. त्यामुळे दोन्ही धरणभागांतील गावात पाणीटंचाई वाढत आहे. नीरा देवघर धरणात ३० टक्के ३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, तर भाटघर धरणात ८.५९ टक्के २ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मागील वर्षी दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. मागच्या तुलनेत या वेळी धरणाचा पाणीसाठ्यात घट झाली आहे. वीर धरणात ३४.४३ टक्के ३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. शिवाय भोरमधील तिन्ही धरणांचे पाणी नदीद्वारे वीर धरणात जात आहे. भाटघर धरणातील वीजनिर्मिती केंद्र डिसेंबरला सुरू झाले. दोन महिन्यांत पाण्याअभावी बंद आहे. नीरा देवघर धरणावरील वीजनिर्मिती केंद्र आॅक्टोबरला सुरू झाले, त्यात अजून १५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. भाटघरला १६ तर नीरा देवघरला ६ मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते. पूर्वभागातील पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून या वेळी दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली सोडले आहे. यामुळे पूर्व भागाची तहान भागत असली तरी भोरमधील धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने नीरा देवघर व भाटघर धरण भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत धरणात पाणीसाठा अत्यंत कमी आहे. विशेषत: भाटघर धरणात २४ पैकी फक्त २ टीएमसी पाणीसाठाच शिल्लक आहे. त्यातही निम्मा गाळ आहे. अद्यापही धरणातून पाणी सुरू राहिल्यास अत्यल्प पाणीसाठा राहून धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. धरणाच्या पाण्यावर अनेक नळपाणीपुरवठा योजना आहेत. धरणाचे पाणी कमी झाल्यावर विहिरींनाही पाणी कमी पडते आणि टंचाई भासते. त्यामुळे भाटघर धरणातील पाणी सोडणे बंद करायला हवे, अशी मागणी होत आहे.