शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

नीरा देवघर-भाटघर पाणीसाठ्यात घट

By admin | Updated: May 12, 2014 03:30 IST

या वर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे पूर्व भागातील पाणीटंचाईमुळे बारामती, इंदापूर, अकलूज यांच्यासह इतर भागाला भोर तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर धरणातून पाणी नीरा नदीत सोडले आहे.

भोर : या वर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे पूर्व भागातील पाणीटंचाईमुळे बारामती, इंदापूर, अकलूज यांच्यासह इतर भागाला भोर तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर धरणातून पाणी नीरा नदीत सोडले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठा कमी-कमी होतोय. त्यामुळे दोन्ही धरणभागांतील गावात पाणीटंचाई वाढत आहे. नीरा देवघर धरणात ३० टक्के ३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, तर भाटघर धरणात ८.५९ टक्के २ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मागील वर्षी दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. मागच्या तुलनेत या वेळी धरणाचा पाणीसाठ्यात घट झाली आहे. वीर धरणात ३४.४३ टक्के ३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. शिवाय भोरमधील तिन्ही धरणांचे पाणी नदीद्वारे वीर धरणात जात आहे. भाटघर धरणातील वीजनिर्मिती केंद्र डिसेंबरला सुरू झाले. दोन महिन्यांत पाण्याअभावी बंद आहे. नीरा देवघर धरणावरील वीजनिर्मिती केंद्र आॅक्टोबरला सुरू झाले, त्यात अजून १५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. भाटघरला १६ तर नीरा देवघरला ६ मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते. पूर्वभागातील पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून या वेळी दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली सोडले आहे. यामुळे पूर्व भागाची तहान भागत असली तरी भोरमधील धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने नीरा देवघर व भाटघर धरण भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत धरणात पाणीसाठा अत्यंत कमी आहे. विशेषत: भाटघर धरणात २४ पैकी फक्त २ टीएमसी पाणीसाठाच शिल्लक आहे. त्यातही निम्मा गाळ आहे. अद्यापही धरणातून पाणी सुरू राहिल्यास अत्यल्प पाणीसाठा राहून धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. धरणाच्या पाण्यावर अनेक नळपाणीपुरवठा योजना आहेत. धरणाचे पाणी कमी झाल्यावर विहिरींनाही पाणी कमी पडते आणि टंचाई भासते. त्यामुळे भाटघर धरणातील पाणी सोडणे बंद करायला हवे, अशी मागणी होत आहे.