शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

संगीतातील विविध छटांचा अभ्यास करण्याची गरज : डॉ. सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:10 IST

पुणे: ‘गाणं’ हे माणसात उत्स्फूर्त असते. त्यातूनच लोकसंगीताचा जन्म झाला. या संगीताचा गांभीर्याने विचार करत त्याला एका शास्त्रीय चौकटीत ...

पुणे: ‘गाणं’ हे माणसात उत्स्फूर्त असते. त्यातूनच लोकसंगीताचा जन्म झाला. या संगीताचा गांभीर्याने विचार करत त्याला एका शास्त्रीय चौकटीत बांधल्यानंतर शास्त्रीय संगीत पुढे आले. संगीतातील या वेगवेगळ्या छटांमध्ये कायमच देवाणघेवाण सुरु असते. परंतु या सगळ्याचा आजवर कोणी नीट अभ्यास केलेला नाही. तो होणे आवश्यक आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित 'अभिवादन' कार्यक्रमात (दि. ७) साहित्य, चित्रपट व रंगचित्र या माध्यमातील दिग्गजांनी पंडितजींच्या आठवणींना उजाळा दिला. यात ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे व पंडितजींचे चिरंजीव आणि प्रसिध्द रंगचित्र तज्ञ जयंत जोशी सहभागी झाले होते. त्यांच्याशी लेखक, दिग्दर्शक व गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी संवाद साधला.

संत साहित्य, भजने, लोकसंगीत व शास्त्रीय संगीताशी पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीच्या सांगड घालत मोरे म्हणाले, ‘बालगंधर्व’ हे नाव आपल्याला नाट्य संगीतासाठी माहिती आहे. मात्र त्यांच्या उत्तर काळात त्यांनी असंख्य भजने गायली आहेत. त्या अर्थाने भजनांना शास्त्रीय ढंगात गाण्याचे काम प्रथम बालगंधर्वांनी केले. तोच वारसा पंडितजींनी पुढे चालवत अभंगवाणीद्वारा त्याला विस्तृत रूप दिले. कुमार गंधर्वांची भजन गायकी ही निर्गुणी पद्धतीची होती. कारण ती गायकी बाहेरून अंतर्मनात शिरते तर पंडितजींची गायकी सगुणी आहे असे वाटते. कारण आतला निर्गुण निराकार भगवंत ते बाहेर आणत त्याला आपल्यासमोर सगुण साकार करतात.

चित्रपट, देहबोली आणि पंडितजींच्या गायकीविषयी सांगताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, अण्णांना गाताना बघताना असं नेहमी जाणवायच की त्यांच्या आत प्रचंड तळमळ आहे. त्यांना काहीतरी गाठायचे आहे, मिळवायचे आहे . त्यांचे आंतरिक भाव त्यांच्या देहबोलीतून बाहेर प्रकट होत. त्यामुळे त्यांना गातांना बघणे हा म्हणजे एक सौंदर्यानुभव असल्याची प्रचिती यायची. माजी मुख्यमंत्री वसंत पाटील हे मुख्यमंत्री असताना पंडितजींवर माहितीपट करण्याची संधी मिळाली. त्यावेळी पंडितजींचे सानिध्य अधिक लाभले. त्यावेळचे त्यांचे वाक्य आठवते, ते म्हणायचे, रियाज हा रियाज असतो, मैफल ही मैफल असते. मैफिलीत रियाज करू नये. ही बाब कोणत्याही कलेसाठी अगदी लागू पडते.

जयंत जोशी म्हणाले, संगीत ही स्वयंभू, परिपूर्ण कला आहे. यात तुम्ही तल्लीन झालात तरच गाणं रंगते. घरात खूप तेजस्वी गाणं होतं. वडिलांना वायाच्या ९ व्या वर्षीच आयुष्याचे ध्येय सापडले होते. बाबा म्हणत शरीर हे गाण्याचे वाद्य आहे. आणि ते त्याची तशी काळजीपण घेत. त्याचं गाणं फार प्रामाणिक होतं.