शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

गडसंवर्धनासाठी चळवळीची गरज

By admin | Updated: May 15, 2016 00:29 IST

गड-किल्ले ही महाराष्ट्राची खरी ओळख आणि संपत्ती आहे. पाणदुर्ग, डोंगरी गढ्या आणि डोंगरी किल्ले मिळून एकूण गड-किल्ल्यांची संख्या सातशेच्या घरात जाते

नारायणपूर : गड-किल्ले ही महाराष्ट्राची खरी ओळख आणि संपत्ती आहे. पाणदुर्ग, डोंगरी गढ्या आणि डोंगरी किल्ले मिळून एकूण गड-किल्ल्यांची संख्या सातशेच्या घरात जाते आणि याचे श्रेय जाते ते स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवरायांना. शिवकालीन गड-किल्ले हा आपला ऐतिहासिक ठेवा. आज अनेक गड-किल्ले जीर्णावस्थेत आहेत,.त्यांची पडझड झाली आहे. आता यापुढील लढाई ही गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची असेल, असे मत कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले. किल्ले पुरंदरवर सकाळी छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पुतळ्यास जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पुरंदर पंचायत समितीच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले. संभाजीमहाराज यांच्या जन्माचा पाळणा या वेळी म्हणण्यात आला. पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मिरवणूक, भंडारा आणि दिवसभर विविध कार्यक्रमावेळी हजारो शंभूभक्त उपस्थित होते. राज्यस्तरीय ‘छत्रपती संभाजी गौरव पुरस्कार’ सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुलींनी दोर, मल्लखांबांची चित्तथरारक प्रात्यक्षिके केली. ढाल -तलवार लढाईची प्रात्यक्षिके, कसरती मुलांनी करून दाखविल्या. संभाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. महाराजांच्या जयघोषाने किल्ला दणाणून गेला होता. ठिकठिकाणी संभाजीमहाराज यांच्या काळातील शस्त्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती. माजी खासदार रणजितसिंह मोहिते, आमदार जितेंद्र आव्हाड, संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड, माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर पंचायत समिती सभापती अंजना भोर, पुरंदर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटणे, मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप, संभाजी ब्रिगेडचे राज्याचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश मुळीक, माजी उपसभापती माणिकराव झेंडे पाटील, पं. स. सदस्य दत्तात्रय झुरंगे, दिलीप यादव, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, बहुजन हक्क परिषेदेचे अध्यक्ष सुनील धिवार, राहुल पोकळे, विक्रम बोरकर, तालुकाध्यक्ष अजयसिंह सावंत, कार्याध्यक्ष सागर जगताप उपस्थित होते.आव्हाड म्हणाले की, छत्रपती संभाजीमहाराज यांनी पूर्वी नदीजोड प्रकल्पाचे काम केले आहे. आजपर्यंत महाराजांचे फक्त चारित्र्यहनन करण्याचे काम करण्यात आले आहे. संभाजीमहाराजांचा खरा इतिहास पुढे आणायचा असेल, तर युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. (प्रतिनिधी)