शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

डोळस वृत्तीने पाहण्याची गरज

By admin | Updated: February 5, 2015 00:16 IST

लहान मुलांसाठी कवितांची शिबिरे, वाचनाचे कार्यक्रम, साहित्यिकांशी संवाद साधणे, असे अनेक उपक्रम शाळांच्या माध्यमातून राबविले जात आहेत.

पुणे : लहान मुलांसाठी कवितांची शिबिरे, वाचनाचे कार्यक्रम, साहित्यिकांशी संवाद साधणे, असे अनेक उपक्रम शाळांच्या माध्यमातून राबविले जात आहेत. त्यामुळे सरसकट बालसाहित्य विश्वात मुलांसाठी काहीच होत नाही, हा समज चुकीचा आहे. केवळ आसपास डोळस वृत्तीने पाहण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि ऊर्मी संस्थेतर्फे मारूंजी (ता. मुळशी) येथे होणाऱ्या २६व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. मुलांसाठी सातत्याने काम करणारी कवयित्री म्हणून नावलौकिक असलेल्या संगीता बर्वे यांनी ‘गंमत झाली भारी’, ‘उजेडाचा गाव’, ‘रान फुले’, ‘झाड आजोबा’, ‘खारूताई आणि सावलीबाई’, ‘हुर्रे हूप’ या काव्यसंग्रहासह एकांकिका, ललितलेखनाच्या माध्यमातून साहित्य विश्वात स्वत:चा ठसा उमटविला आहे. मुलांसाठी ‘गंमत झाली भारी’, ‘या रे या सारे गाऊ या’ अशा कार्यक्रमांचे सादरीकरणही त्या करतात. इयत्ता दहावीच्या पुस्तकामध्ये ‘मल्हारची धून’ या त्यांच्या कवितेचाही समावेश आहे. ‘आकाश कवितेचे’ या शिबिरातून पूर्वसूरींच्या कवितांची ओळख करून देत मुलांना काव्यनिर्मितीस त्या प्रवृत्त करतात. मुलांचा कल वाचनाकडे वळविण्यासाठी भाषेची गंमत काय असते, हे त्यांना आधी सांगण्याची गरज आहे. घर तिथे शौचालयासारखे शाळा तिथे ग्रंथालय ही संकल्पना रुजविण्याची गरज आहे. आज मुलांच्या हातात सरसकट मोबाईल दिले जातात, पण पुस्तके दिल्यावर फाटेल म्हणून त्यांना ओरडले जाते, त्यामुळेच पुस्तकांपेक्षा त्यांची मोबाईलशी अधिक मैत्री झाली आहे. यासाठी पालकांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आज बालसाहित्य पोहोचले नसले,तरी शाळांमध्ये साहित्याची गोडी मुलांना लागावी यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. (प्रतिनिधी)प्रगल्भ जाणिवा तयार होतील१ बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, की बालकुमार साहित्य संमेलन म्हणजे मुलांची गर्दी, असे चित्र खरेतर असता कामा नये. २ ज्या मुलांना कथा, कादंबऱ्या वाचनाची आवड आहे, अशा मुलांची शाळांमधून निवड करून अशा मुलांना संमेलनात बोलवायला हवे. ३ साहित्याची आवड असणाऱ्या मुलांची संमेलने झाली, तर त्यांच्यामध्ये साहित्याच्या प्रगल्भ जाणिवा विकसित होतील आणि संमेलनाला खऱ्या अर्थाने अभिजाततेचे स्वरूप प्राप्त होईल.