शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

डोळस वृत्तीने पाहण्याची गरज

By admin | Updated: February 5, 2015 00:16 IST

लहान मुलांसाठी कवितांची शिबिरे, वाचनाचे कार्यक्रम, साहित्यिकांशी संवाद साधणे, असे अनेक उपक्रम शाळांच्या माध्यमातून राबविले जात आहेत.

पुणे : लहान मुलांसाठी कवितांची शिबिरे, वाचनाचे कार्यक्रम, साहित्यिकांशी संवाद साधणे, असे अनेक उपक्रम शाळांच्या माध्यमातून राबविले जात आहेत. त्यामुळे सरसकट बालसाहित्य विश्वात मुलांसाठी काहीच होत नाही, हा समज चुकीचा आहे. केवळ आसपास डोळस वृत्तीने पाहण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि ऊर्मी संस्थेतर्फे मारूंजी (ता. मुळशी) येथे होणाऱ्या २६व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. मुलांसाठी सातत्याने काम करणारी कवयित्री म्हणून नावलौकिक असलेल्या संगीता बर्वे यांनी ‘गंमत झाली भारी’, ‘उजेडाचा गाव’, ‘रान फुले’, ‘झाड आजोबा’, ‘खारूताई आणि सावलीबाई’, ‘हुर्रे हूप’ या काव्यसंग्रहासह एकांकिका, ललितलेखनाच्या माध्यमातून साहित्य विश्वात स्वत:चा ठसा उमटविला आहे. मुलांसाठी ‘गंमत झाली भारी’, ‘या रे या सारे गाऊ या’ अशा कार्यक्रमांचे सादरीकरणही त्या करतात. इयत्ता दहावीच्या पुस्तकामध्ये ‘मल्हारची धून’ या त्यांच्या कवितेचाही समावेश आहे. ‘आकाश कवितेचे’ या शिबिरातून पूर्वसूरींच्या कवितांची ओळख करून देत मुलांना काव्यनिर्मितीस त्या प्रवृत्त करतात. मुलांचा कल वाचनाकडे वळविण्यासाठी भाषेची गंमत काय असते, हे त्यांना आधी सांगण्याची गरज आहे. घर तिथे शौचालयासारखे शाळा तिथे ग्रंथालय ही संकल्पना रुजविण्याची गरज आहे. आज मुलांच्या हातात सरसकट मोबाईल दिले जातात, पण पुस्तके दिल्यावर फाटेल म्हणून त्यांना ओरडले जाते, त्यामुळेच पुस्तकांपेक्षा त्यांची मोबाईलशी अधिक मैत्री झाली आहे. यासाठी पालकांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आज बालसाहित्य पोहोचले नसले,तरी शाळांमध्ये साहित्याची गोडी मुलांना लागावी यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. (प्रतिनिधी)प्रगल्भ जाणिवा तयार होतील१ बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, की बालकुमार साहित्य संमेलन म्हणजे मुलांची गर्दी, असे चित्र खरेतर असता कामा नये. २ ज्या मुलांना कथा, कादंबऱ्या वाचनाची आवड आहे, अशा मुलांची शाळांमधून निवड करून अशा मुलांना संमेलनात बोलवायला हवे. ३ साहित्याची आवड असणाऱ्या मुलांची संमेलने झाली, तर त्यांच्यामध्ये साहित्याच्या प्रगल्भ जाणिवा विकसित होतील आणि संमेलनाला खऱ्या अर्थाने अभिजाततेचे स्वरूप प्राप्त होईल.