शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

ज्ञानभक्तीचा प्रसार होणो आवश्यक

By admin | Updated: November 23, 2014 00:08 IST

संतमांदियाळीत ज्ञानोबा, तुकोबा यांबरोबरच सावतामहाराज, चोखोबा, गुरुनानक, कबीर, सूरदास यांसारख्या संतांचाही समावेश होतो,

पुणो :  संतमांदियाळीत ज्ञानोबा, तुकोबा यांबरोबरच सावतामहाराज, चोखोबा, गुरुनानक, कबीर, सूरदास यांसारख्या संतांचाही  समावेश  होतो, मात्र या संतांच्या रचना महाराष्ट्रात विशेष गायल्या जात नाहीत. त्यामुळे  या संतांच्या पारंपरिक रचना संगीतबद्ध करून त्यामधील भावार्थ उलगडून सांगण्याचा  प्रयत्न करीत आहे.  संगीताबरोबरच ज्ञानभक्तीचा अधिकाधिक प्रसार होणो महत्त्वपूर्ण असल्याचे किराणा घराण्याचे गायक आणि प्रतिभावंत संगीतकार पं. यादवराज फड यांनी सांगितले. 
संगीतोन्मेष संस्थेच्या वतीने पं. यादवराज फड यांनी संगीतबद्ध केलेल्या पारंपरिक रचनांवर आधारित   ‘भक्ती-स्वरगंध’ या कार्यक्रमाची 1000 मैफल उद्या विधी महाविद्यालय रस्त्यावरील फिल्म इन्स्टिटय़ूटच्या सभागृहात होत आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी  संवाद साधला. 
 भक्तिसंगीतामध्ये ‘भाव’ अत्यंत महत्त्वाचा आहे. गायकीत जोर्पयत भाव उतरत नाहीत तोर्पयत ते संगीत रुक्ष वाटते. भावहीन संगीत मनाला नाहीतर बुद्धीला आनंद देऊ शकते, असे सांगून फड म्हणाले, की श्रोत्यांना कोणत्या भावाद्वारे सांगायचे आहे, त्या रचनांमधील आशय काय आहे, याचा विचार करून संगीत देण्याचा प्रयत्न मी केला आहे. कारण भावभक्ती अंगात भिनल्याशिवाय  ‘ज्ञानाची’  प्रचिती येत नाही. 
सामान्यांपासून विद्वानांर्पयत भक्तिभाव पोहोचविणो हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. 
या कार्यक्रमाच्या अनुभूतीमधून  ‘पांडुरंग भेटवलासी’ अशी अवस्था रसिकजनांची झाल्याशिवाय राहात नाही.  म्हणूनच   ‘संगीतापेक्षा’ही सावतामहाराज, चोखोबा, संत कबीर, सूरदास, मीराबाई  यांसारख्या संतमांदियाळीतील संतांच्या रचनांमधील भावार्थ उलगडून दाखविण्याला अधिक प्राधान्य दिले आहे. या 1क्क्क्व्या मैफलीत पारंपरिक  ‘पंचपदी’चा समावेश असणार आहे.  
ईशस्तवन,  ‘जय जय रामकृष्ण हरी’ बीजमंत्र, रूप, ध्यान आणि ‘जय जय विठ्ठल’चा जयघोष केला जाणार आहे. दैवतांच्या रचना सादर करून त्यांची आराधना करणो हे त्यामागील प्रयोजन आहे. (प्रतिनिधी)
 
घुमान या संत नामदेवांच्या कर्मभूमीत यंदाचे 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे,  ही चांगली गोष्ट आहे. मात्र या संमेलनात  वारकरी संप्रदायाचा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे.   संमेलनाला सन्मानाने बोलाविले तरच जाणार आहे. कारण वादक, गायक यांना एवढय़ा लांब एकत्रितपणो घेऊन जाणो शक्य नाही. - पं. यादवराज फड