शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारिता समाजहितासाठी हवी

By admin | Updated: April 26, 2015 01:24 IST

‘पत्रकारिता ही समाजहिताची असावी. समाजातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम लेखणीतून झाले पाहिजे.

पुणे : ‘‘पत्रकारिता ही समाजहिताची असावी. समाजातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम लेखणीतून झाले पाहिजे. ध्येयवादी पत्रकारिता करणाऱ्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देऊन त्यांना समाजासमोर आणण्याची अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली. तसेच, वृत्तपत्राचे स्वरूप काळानुरूप बदलत असून, ते आत्मसात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले. वरुणराज भिडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित वरुणराज भिडे पुरस्कार वितरणाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या वेळी ‘लोकमत’चे बातमीदार-उपसंपादक सुनील राऊत यांचा वरुणराज भिडे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, गुरुबाल माळी व सरिता कौशिक यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. समीर वैरागी व शिल्पा पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विलास जोशी, अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई व शैलेश गुजर उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘पत्रकारिता ही समाजहिताचीच असली पाहिजे. कालपरत्वे वृत्तपत्रांमध्ये कमालीचे बदल झालेले आहेत. पहिल्या पानावर ज्या दिवसभरातल्या घडामोंडीवर आधारित ठळक बातमी दिसली पाहिजे ती दिसत नाही. हे बदल आत्मसात करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच, अशा बदलांना सामोरे जाण्याची शक्ती मिळेल.’’ (प्रतिनिधी)नव्या लोकांनाही मार्गदर्शन करा......४उल्हास पवार यांनी १९६७मध्ये शरद पवार यांना निवडणुकीमध्ये मदत केली होती म्हणून ते निवडून आले होते, असा चिमटा पवारांना काढला. यावर उदय निरगुडकर यांनी २०१४मध्ये जर अशीच मदत केली असती, तर अशी परिस्थिती उद्भवली असती का? अशी टिप्पणी उल्हास पवारांना उद्देशून केली, त्यावर ऐकून घेतील ते शरद पवार कसले! त्यांनीही मग आता निवडणुकीत नव्या लोकांना सहकार्य करावे, तसेही आता ’ते’ रिकामेच आहे, अशा शब्दांत उल्हास पवारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. निवडणुकीत कसा आलो..? पवारांनी केला गौप्यस्फोट४राजकारणात येण्यामागचे महत्त्वाचे कारण कोणते असेल? ते म्हणजे ’दूध’, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. सकाळी उठून चहा आवडत नसल्यामुळे दूध प्यावे लागायचे. ते प्यावे लागू नये म्हणून लवकर बाहेर पडायचो. त्यातून सवंगडी जमत गेले. ज्या वेळी १९६७मध्ये पहिली निवडणूक लढविली, त्या वेळी मत मागण्यासाठी लोकांच्या दारी जायचो. महिला चहाचा कप आणून द्यायच्या; पण चहा प१त नसल्याने ‘नको’ म्हणत असे. त्यावर आमच्या हातचा चहा पीत नाही तर आमच्यासाठी काय काम करणार? असे तोंडावर महिला सुनवायच्या. राजकारणात आल्यावर सवयी बदलल्या; पण त्यानंतर कधी कुणाच्या दारावर मतं मागायला गेलो नाही, असे पवारांनी सांगितले.