शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

पत्रकारिता समाजहितासाठी हवी

By admin | Updated: April 26, 2015 01:24 IST

‘पत्रकारिता ही समाजहिताची असावी. समाजातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम लेखणीतून झाले पाहिजे.

पुणे : ‘‘पत्रकारिता ही समाजहिताची असावी. समाजातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम लेखणीतून झाले पाहिजे. ध्येयवादी पत्रकारिता करणाऱ्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देऊन त्यांना समाजासमोर आणण्याची अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली. तसेच, वृत्तपत्राचे स्वरूप काळानुरूप बदलत असून, ते आत्मसात करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले. वरुणराज भिडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित वरुणराज भिडे पुरस्कार वितरणाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या वेळी ‘लोकमत’चे बातमीदार-उपसंपादक सुनील राऊत यांचा वरुणराज भिडे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, गुरुबाल माळी व सरिता कौशिक यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. समीर वैरागी व शिल्पा पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विलास जोशी, अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई व शैलेश गुजर उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘पत्रकारिता ही समाजहिताचीच असली पाहिजे. कालपरत्वे वृत्तपत्रांमध्ये कमालीचे बदल झालेले आहेत. पहिल्या पानावर ज्या दिवसभरातल्या घडामोंडीवर आधारित ठळक बातमी दिसली पाहिजे ती दिसत नाही. हे बदल आत्मसात करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच, अशा बदलांना सामोरे जाण्याची शक्ती मिळेल.’’ (प्रतिनिधी)नव्या लोकांनाही मार्गदर्शन करा......४उल्हास पवार यांनी १९६७मध्ये शरद पवार यांना निवडणुकीमध्ये मदत केली होती म्हणून ते निवडून आले होते, असा चिमटा पवारांना काढला. यावर उदय निरगुडकर यांनी २०१४मध्ये जर अशीच मदत केली असती, तर अशी परिस्थिती उद्भवली असती का? अशी टिप्पणी उल्हास पवारांना उद्देशून केली, त्यावर ऐकून घेतील ते शरद पवार कसले! त्यांनीही मग आता निवडणुकीत नव्या लोकांना सहकार्य करावे, तसेही आता ’ते’ रिकामेच आहे, अशा शब्दांत उल्हास पवारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. निवडणुकीत कसा आलो..? पवारांनी केला गौप्यस्फोट४राजकारणात येण्यामागचे महत्त्वाचे कारण कोणते असेल? ते म्हणजे ’दूध’, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. सकाळी उठून चहा आवडत नसल्यामुळे दूध प्यावे लागायचे. ते प्यावे लागू नये म्हणून लवकर बाहेर पडायचो. त्यातून सवंगडी जमत गेले. ज्या वेळी १९६७मध्ये पहिली निवडणूक लढविली, त्या वेळी मत मागण्यासाठी लोकांच्या दारी जायचो. महिला चहाचा कप आणून द्यायच्या; पण चहा प१त नसल्याने ‘नको’ म्हणत असे. त्यावर आमच्या हातचा चहा पीत नाही तर आमच्यासाठी काय काम करणार? असे तोंडावर महिला सुनवायच्या. राजकारणात आल्यावर सवयी बदलल्या; पण त्यानंतर कधी कुणाच्या दारावर मतं मागायला गेलो नाही, असे पवारांनी सांगितले.