शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

लोकवाङ्मयाचे जतन करणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 01:03 IST

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मराठी भाषेचे रूप झपाट्याने बदलत असल्यामुळे मौखिक परंपरेतील ओवीसारखे छंदातील लोकवाङ्मय खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे

राजगुरुनगर : ‘‘आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मराठी भाषेचे रूप झपाट्याने बदलत असल्यामुळे मौखिक परंपरेतील ओवीसारखे छंदातील लोकवाङ्मय खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचे जतन करणे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रा. संतोष पवार यांनी केले. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘रंग कवितेचे’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, कला विभागप्रमुख डॉ. ए. एम. पवार, कवी संतोष गाढवे, प्रा. किशोर लांडे-पाटील, प्रा. एम. एल. मुळूक, प्रा. धनंजय वाघ, प्रा. किरण गाढवे, प्रा. वर्षा कांबळे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.जगण्याला लय असली, की कविता ओठात येते आणि आपल्याशी नाते जोडते. त्यासाठी लयीला शब्दांची जोड हवी, असे सांगून पवार यांनी त्यांच्या ग्रामीण भागातील स्त्रियांचे दु:ख मांडणाऱ्या कविता सादर केल्या. ‘माहेराला माती होती, सासरला माती माती, माती जन्माची सोबती’ ही स्त्रीचे मातीशी नाते सांगणारी कविता त्यांनी सादर केली. तसेच, वधूपित्याची भावना मांडणारी ‘पदर आलेली कन्या, पदरमोड करून, तुमच्या पदरात घातली’ ही कविता सादर केली. गावातील मुलगी पाण्याला जाताना तिच्यावर जो अतिप्रसंग घडला; त्यामुळे तिचे जीवन उद्ध्वस्त झाले, याचे चित्रण करणारी कविता ‘गावात पोर पाण्याला गेली, वाटेत गुंडा टाकून आली, धुळवडीचा दिवस होता, रंगात पोर माखून गेली’ ही कविता उपस्थितांना हेलावून गेली. शेवटी त्यांनी आपल्या आईबद्दलची ‘माय होतीच टसली, जशी चुलीची धसली, अशी जळली घरात, नाही धुराने धुपली’ अशी भावना व्यक्त करणारी कविता सादर करून मातृशक्तीचे महत्त्व सांगितले.