शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

मुलांवर चांगले संस्कार करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:13 IST

समाजातील विकृतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आईच्या कुशीत असलेली तान्ही मुलगीही आजकाल सुरक्षित नाही. सर्वच वयोगटातील महिला कमालीच्या असुरक्षिततेमध्ये ...

समाजातील विकृतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आईच्या कुशीत असलेली तान्ही मुलगीही आजकाल सुरक्षित नाही. सर्वच वयोगटातील महिला कमालीच्या असुरक्षिततेमध्ये जगत आहेत. शालेय वयापासून मुलींना कराटेसारखे प्रशिक्षण देण्याची गरज आहेच; मात्र, सर्वात जास्त गरज आहे ती मुलांवर चांगले संस्कार करण्याची, स्त्रीसन्मानाचे धडे गिरवण्याची. ‘तू स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे’, ही बाब लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवण्याची गरज असते. मुलांसाठी असे वर्ग सुरू करणे, अभ्यासक्रमात याबाबतच्या शिक्षणाचा समावेश करण्याची नितांत गरज आहे.

दररोज बलात्काराची नवनवीन प्रकरणे समोर येत असताना पोलीस प्रशासनाकडे काही ‘अॅक्शन प्लॅन’ आहे की नाही, हेच कळायला तयार नाही. अनेकदा १०० क्रमांकावर संपर्क साधला तरी फोन उचललाही जात नाही. ‘प्रतिसाद’ अॅपचे पुढे काय झाले, हे माहीत नाही. शहरात विविध ठिकाणी सुमारे १५०० सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. ते कार्यरत आहेत की नाही, याबाबतही कल्पना नाही. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणांनी आता ठोस अॅक्शन प्लॅन तयार केला पाहिजे. दररोज अशा घटना घडत असतील तर त्यासंदर्भात काय पावले उचलली जात आहेत? केवळ निवेदने स्वीकारून बदल घडणार नाहीत, प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी बलात्कारांच्या प्रकरणांतील आरोपींना कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे.

कोथरूडमध्येही दररोज टेकडीवर फिरायला जाणा-या महिलांना वाईट अनुभव येतात. परवाच कोथरूडमध्ये एक ताई सकाळी ९ वाजता आपल्या लहान मुलाला घेऊन गोपीनाथनगर टेकडीवर लहान मुलाला घेऊन गेल्या असताना एका तरुणाने असभ्य वर्तन केले. अशा घटना वारंवार घडत असूनही ठोस पावले उचलली जात नाहीत. महिलांची सुरक्षितता, त्यांचा स्वाभिमान, त्यांची अस्मिता जपली जाणार आहे की नाही, असा प्रश्न पडतो. बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांपैकी किती जणांचे व्हेरिफिकेशन केले जाते, याचा आकडा पोलिसांकडे नाही. बाहेरुन आलेल्या आणि भाड्याच्या घरामध्ये राहणा-या लोकांची एकत्रित नोंद उपलब्ध नाही. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित सर्व उपाययोजना यंत्रणेकडून तातडीने झाल्या पाहिजेत. बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नका, असे आवाहन अॅड. वैशाली चांदणे यांनी वकिलांना केले आहे, याबाबत मी त्यांचे अभिनंदन करते. विकृत मानसिकतेच्या लोकांना आणि यंत्रणेला ‘ती’चा गणपती सदबुद्धी देवो, हीच प्रार्थना!