शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांवर चांगले संस्कार करण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:13 IST

समाजातील विकृतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आईच्या कुशीत असलेली तान्ही मुलगीही आजकाल सुरक्षित नाही. सर्वच वयोगटातील महिला कमालीच्या असुरक्षिततेमध्ये ...

समाजातील विकृतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आईच्या कुशीत असलेली तान्ही मुलगीही आजकाल सुरक्षित नाही. सर्वच वयोगटातील महिला कमालीच्या असुरक्षिततेमध्ये जगत आहेत. शालेय वयापासून मुलींना कराटेसारखे प्रशिक्षण देण्याची गरज आहेच; मात्र, सर्वात जास्त गरज आहे ती मुलांवर चांगले संस्कार करण्याची, स्त्रीसन्मानाचे धडे गिरवण्याची. ‘तू स्त्रीचा सन्मान केलाच पाहिजे’, ही बाब लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवण्याची गरज असते. मुलांसाठी असे वर्ग सुरू करणे, अभ्यासक्रमात याबाबतच्या शिक्षणाचा समावेश करण्याची नितांत गरज आहे.

दररोज बलात्काराची नवनवीन प्रकरणे समोर येत असताना पोलीस प्रशासनाकडे काही ‘अॅक्शन प्लॅन’ आहे की नाही, हेच कळायला तयार नाही. अनेकदा १०० क्रमांकावर संपर्क साधला तरी फोन उचललाही जात नाही. ‘प्रतिसाद’ अॅपचे पुढे काय झाले, हे माहीत नाही. शहरात विविध ठिकाणी सुमारे १५०० सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. ते कार्यरत आहेत की नाही, याबाबतही कल्पना नाही. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणांनी आता ठोस अॅक्शन प्लॅन तयार केला पाहिजे. दररोज अशा घटना घडत असतील तर त्यासंदर्भात काय पावले उचलली जात आहेत? केवळ निवेदने स्वीकारून बदल घडणार नाहीत, प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी बलात्कारांच्या प्रकरणांतील आरोपींना कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे.

कोथरूडमध्येही दररोज टेकडीवर फिरायला जाणा-या महिलांना वाईट अनुभव येतात. परवाच कोथरूडमध्ये एक ताई सकाळी ९ वाजता आपल्या लहान मुलाला घेऊन गोपीनाथनगर टेकडीवर लहान मुलाला घेऊन गेल्या असताना एका तरुणाने असभ्य वर्तन केले. अशा घटना वारंवार घडत असूनही ठोस पावले उचलली जात नाहीत. महिलांची सुरक्षितता, त्यांचा स्वाभिमान, त्यांची अस्मिता जपली जाणार आहे की नाही, असा प्रश्न पडतो. बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांपैकी किती जणांचे व्हेरिफिकेशन केले जाते, याचा आकडा पोलिसांकडे नाही. बाहेरुन आलेल्या आणि भाड्याच्या घरामध्ये राहणा-या लोकांची एकत्रित नोंद उपलब्ध नाही. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित सर्व उपाययोजना यंत्रणेकडून तातडीने झाल्या पाहिजेत. बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नका, असे आवाहन अॅड. वैशाली चांदणे यांनी वकिलांना केले आहे, याबाबत मी त्यांचे अभिनंदन करते. विकृत मानसिकतेच्या लोकांना आणि यंत्रणेला ‘ती’चा गणपती सदबुद्धी देवो, हीच प्रार्थना!