शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

अहिराणी संवर्धनाच्या प्रयत्नांची गरज

By admin | Updated: April 25, 2016 01:04 IST

अहिराणी भाषा समृद्ध आहे. गावाकडच्या लोकांनी भाषेचा वारसा जपला आहे. खेडेगावात आजही घरोघरी बहिणाबाई आहेत.

पिंपरी : अहिराणी भाषा समृद्ध आहे. गावाकडच्या लोकांनी भाषेचा वारसा जपला आहे. खेडेगावात आजही घरोघरी बहिणाबाई आहेत. अहिराणी भाषा, म्हणी, ओव्या, लग्नातील गाणी, कानबाई-गौराई गीत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत. भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत संमेलनाध्यक्षा डॉ. उषा सावंत यांनी व्यक्त केले.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात खान्देश अहिराणी कस्तुरी मंचाच्या वतीने एकदिवसीय तिसरे राज्यस्तरीय अहिराणी कस्तुरी साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या. प्रारंभी गौराई, साने गुरुजी व बहिणाबाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून सुरुवात झाली. भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस नामदेव ढाके, महाराष्ट्र जनसंग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे, मंचाच्या संस्थापक विजया मानमोडे, ज्येष्ठ साहित्यिक बापूसाहेब पिंगळे, निर्माते कैलास वाणी, अभिनेते-लेखक प्रवीण तरडे, योगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.मानमोडे म्हणाल्या, ‘‘अहिराणीस राजभाषा म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. खान्देश सांस्कृतिक भवनाची मागणी करणार आहे.’’ पद्मश्री स्व. डॉ. भवरलाल जैन यांना मरणोत्तर ‘अखिल भारतीय खान्देश कोहिनूर’ पुरस्कार, साहित्यिक देविदास हटकर यांना साहित्यरत्न, उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उत्पादनशुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक मोहन वर्दे यांना विशेष सेवा, कुंदन ढाके यांना खान्देशरत्न पुरस्कार, उद्योजक काकासाहेब चौधरी, सुरेश पवार, सुरेश पाटील, दादाभाऊ पाटील, पिंगळे यांना खान्देशभूषण, कैलास वाणी यांना कलारत्न, दीपक पाटील यांना उद्योगरत्न, आमदार उन्मेश पाटील यांना समाजव्रती, गायक शिवदास जोंधळे यांना कलारत्न, ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक एम. के. भामरे यांना समाजरत्न, पत्रकार दीपेश सुराणा यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले. लतिका चौधरी यांच्या ‘गल्लीनी भाऊबंदकी’, तसेच ‘आखाजी’ या विशेषांकाचे प्रकाशन केले.(प्रतिनिधी)