शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

अहिराणी संवर्धनाच्या प्रयत्नांची गरज

By admin | Updated: April 25, 2016 01:04 IST

अहिराणी भाषा समृद्ध आहे. गावाकडच्या लोकांनी भाषेचा वारसा जपला आहे. खेडेगावात आजही घरोघरी बहिणाबाई आहेत.

पिंपरी : अहिराणी भाषा समृद्ध आहे. गावाकडच्या लोकांनी भाषेचा वारसा जपला आहे. खेडेगावात आजही घरोघरी बहिणाबाई आहेत. अहिराणी भाषा, म्हणी, ओव्या, लग्नातील गाणी, कानबाई-गौराई गीत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत. भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत संमेलनाध्यक्षा डॉ. उषा सावंत यांनी व्यक्त केले.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात खान्देश अहिराणी कस्तुरी मंचाच्या वतीने एकदिवसीय तिसरे राज्यस्तरीय अहिराणी कस्तुरी साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या. प्रारंभी गौराई, साने गुरुजी व बहिणाबाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून सुरुवात झाली. भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस नामदेव ढाके, महाराष्ट्र जनसंग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे, मंचाच्या संस्थापक विजया मानमोडे, ज्येष्ठ साहित्यिक बापूसाहेब पिंगळे, निर्माते कैलास वाणी, अभिनेते-लेखक प्रवीण तरडे, योगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.मानमोडे म्हणाल्या, ‘‘अहिराणीस राजभाषा म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. खान्देश सांस्कृतिक भवनाची मागणी करणार आहे.’’ पद्मश्री स्व. डॉ. भवरलाल जैन यांना मरणोत्तर ‘अखिल भारतीय खान्देश कोहिनूर’ पुरस्कार, साहित्यिक देविदास हटकर यांना साहित्यरत्न, उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उत्पादनशुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक मोहन वर्दे यांना विशेष सेवा, कुंदन ढाके यांना खान्देशरत्न पुरस्कार, उद्योजक काकासाहेब चौधरी, सुरेश पवार, सुरेश पाटील, दादाभाऊ पाटील, पिंगळे यांना खान्देशभूषण, कैलास वाणी यांना कलारत्न, दीपक पाटील यांना उद्योगरत्न, आमदार उन्मेश पाटील यांना समाजव्रती, गायक शिवदास जोंधळे यांना कलारत्न, ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक एम. के. भामरे यांना समाजरत्न, पत्रकार दीपेश सुराणा यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले. लतिका चौधरी यांच्या ‘गल्लीनी भाऊबंदकी’, तसेच ‘आखाजी’ या विशेषांकाचे प्रकाशन केले.(प्रतिनिधी)