शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जंगल वाचविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

By admin | Updated: March 22, 2017 03:04 IST

जंगले वाचविण्यासाठी केवळ घोषणाबाजी करून उपयोग होणार नाही. अलीकडच्या काळात जंगलांना आगी लावण्याचे प्रकार वाढले

बारामती : जंगले वाचविण्यासाठी केवळ घोषणाबाजी करून उपयोग होणार नाही. अलीकडच्या काळात जंगलांना आगी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. सोशल मीडियावर फक्त याबाबत नाराजी व्यक्त होते; परंतु जंगलांना लागलेल्या आगी विझविण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत. स्थानिक नागरिक व वन कर्मचाऱ्यांनी एकत्रित आगी विझविण्यासाठी प्रयत्न केल्यास जंगलांना लागलेल्या आगी आटोक्यात येण्यास मदत होईल. आजच्या सेल्फी काढण्याच्या नादात फक्त फोटो काढणे आणि प्रसारित करणे एवढेच काम होऊ शकते. प्रत्यक्ष मात्र वणवे विझविण्यासाठी डोंगरदऱ्यांमध्ये उतरताना कोणीच दिसत नाही. दर वर्षी डोंगर जळत आहेत. त्याबरोबर वन्यप्राणीही होरपळून निघत आहेत. काँक्रीटच्या जंगलात वन दिन साजरा करण्यापेक्षा प्रत्यक्ष वनात जाऊन वन दिन साजरा केल्यास जंगलांशी आपुलकीचे नाते निर्माण होणार आहे. सध्या देखाव्यासाठी शहरांमध्ये, बागबगिचांमध्ये, घराच्या अंगणामध्ये परकीय झुडपे लावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे येथील बहुउपयोगी देशी झाडांना हद्दपार व्हावे लागत आहे. वनविभागदेखील परकीय झाडांनाच खतपाणी घालून वाढवत आहे. माळरानावर असणाऱ्या वन विभागाच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात उंबराच्या झाडाची लागवड झाली पाहिजे. मात्र, तसे न होता केवळ देखाव्यासाठी परकीय झाडांना पसंती दिली जात आहे. उंबराच्या झाडामुळे पशुपक्ष्यांना अन्नपाणी आणि निवाराही मिळतो. ज्या वनात स्थानिक प्रजातीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत, अशा भागात वन्यजीव जास्त प्रमाणत दिसून येतात. अगदी आजकाल शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष सुरू असून हा संघर्ष केवळ वनातील अन्न आणि पाणी नष्ट होत असल्यामुळेच वाढीस लागला आहे. आता शेतातील उपयोगी झाडे असून त्यांची फळे खाण्यासाठी आणि शेतातील पीक खाण्यासाठी वन्यजीव शेतीकडे वळत आहेत. परिणामी, संघर्ष वाढत आहे. (वार्ताहर)