शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

जंगल वाचविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

By admin | Updated: March 22, 2017 03:04 IST

जंगले वाचविण्यासाठी केवळ घोषणाबाजी करून उपयोग होणार नाही. अलीकडच्या काळात जंगलांना आगी लावण्याचे प्रकार वाढले

बारामती : जंगले वाचविण्यासाठी केवळ घोषणाबाजी करून उपयोग होणार नाही. अलीकडच्या काळात जंगलांना आगी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. सोशल मीडियावर फक्त याबाबत नाराजी व्यक्त होते; परंतु जंगलांना लागलेल्या आगी विझविण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत. स्थानिक नागरिक व वन कर्मचाऱ्यांनी एकत्रित आगी विझविण्यासाठी प्रयत्न केल्यास जंगलांना लागलेल्या आगी आटोक्यात येण्यास मदत होईल. आजच्या सेल्फी काढण्याच्या नादात फक्त फोटो काढणे आणि प्रसारित करणे एवढेच काम होऊ शकते. प्रत्यक्ष मात्र वणवे विझविण्यासाठी डोंगरदऱ्यांमध्ये उतरताना कोणीच दिसत नाही. दर वर्षी डोंगर जळत आहेत. त्याबरोबर वन्यप्राणीही होरपळून निघत आहेत. काँक्रीटच्या जंगलात वन दिन साजरा करण्यापेक्षा प्रत्यक्ष वनात जाऊन वन दिन साजरा केल्यास जंगलांशी आपुलकीचे नाते निर्माण होणार आहे. सध्या देखाव्यासाठी शहरांमध्ये, बागबगिचांमध्ये, घराच्या अंगणामध्ये परकीय झुडपे लावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे येथील बहुउपयोगी देशी झाडांना हद्दपार व्हावे लागत आहे. वनविभागदेखील परकीय झाडांनाच खतपाणी घालून वाढवत आहे. माळरानावर असणाऱ्या वन विभागाच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात उंबराच्या झाडाची लागवड झाली पाहिजे. मात्र, तसे न होता केवळ देखाव्यासाठी परकीय झाडांना पसंती दिली जात आहे. उंबराच्या झाडामुळे पशुपक्ष्यांना अन्नपाणी आणि निवाराही मिळतो. ज्या वनात स्थानिक प्रजातीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत, अशा भागात वन्यजीव जास्त प्रमाणत दिसून येतात. अगदी आजकाल शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष सुरू असून हा संघर्ष केवळ वनातील अन्न आणि पाणी नष्ट होत असल्यामुळेच वाढीस लागला आहे. आता शेतातील उपयोगी झाडे असून त्यांची फळे खाण्यासाठी आणि शेतातील पीक खाण्यासाठी वन्यजीव शेतीकडे वळत आहेत. परिणामी, संघर्ष वाढत आहे. (वार्ताहर)