शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

पुण्यापासून ‘अमृत’ दूरच

By admin | Updated: May 15, 2016 00:52 IST

शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून निधी मिळविण्यासाठी महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावास राज्य शासनाने आक्षेप घेतला आहे.

पुणे : शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून निधी मिळविण्यासाठी महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावास राज्य शासनाने आक्षेप घेतला आहे. महापालिकेकडून शहरात प्रतिव्यक्ती सरासरी ३०० लिटर पाणी दिले जात असल्याने राज्यात ज्या मोठ्या शहरांमध्ये, तसेच नगर परिषदांमध्ये पाण्याचे दुर्भिणक्ष आहे. अशा शहरांचा या योजनेच्या पहिल्या पाच वर्षांत निधी देण्याची शासनाची भूमिका असल्याने या योजनेतून निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका आयुक्त कुणाल यांनी शुक्रवारी (दि.१३) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या योजनेच्या निधीसाठी मागणी केली असून, पुढील दोन वर्षे निधी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.जवाहरलाल नेहरू शहरी नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयुआरएम) योजनेतून शहरांना वाहतूक, पाणीपुरवठा, नदी सुधार योजना, रस्ते यासाठी निधी देण्यात येत होता. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर भाजपा सरकारने ही योजना बंद करून अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजना सुरू केली आहे. या योजनेत राज्य शासनाने १३ शहरांचा समावेश केला असून, त्यात पुणे शहरही आहे. त्यानुसार केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार या योजनेच्या पहिल्या ५ वर्षांत राज्यातील शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठीच्या प्रकल्पांना निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासनाने काही निकषही निश्चित करून दिलेले होते. या आधारे महापालिकेने शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजनेतील काही भाग म्हणजेच नवीन टाक्या बांधणे, नवीन जलवाहिन्या टाकणे, तसेच संपूर्ण शहरात ३ लाखांहून अधिक पाणीमीटर बसविण्याचा सुमारे ९३५ कोटी रुपयांचा प्रकल्प अमृत योजनेत सादर केला आहे. हा प्रकल्प सादर करताना, पालिकेकडून प्रतिदिन प्रतिव्यक्ती ३०० लिटर पाणी देण्यात येत असल्याने नमूद केले आहे. त्यामुळे महापालिकेकडून शहरात नागरिकांना भरपूर पाणी दिले जात असल्याने महापालिकेस तूर्तास या योजनेचा निधी देता येणार नाही.