शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

मंचरला राष्ट्रवादीचे वर्चस्व

By admin | Updated: September 13, 2015 01:35 IST

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून बाजार समितीची सत्ता एकहाती काबीज केली आहे. या निवडणुकीत

मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वच्या सर्व १९ जागा जिंकून बाजार समितीची सत्ता एकहाती काबीज केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बाजार समितीतील विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून विजयी मिरवणूक काढली. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी आज क्रीडा संकूल येथे झाली. सुरुवाती पासूनच राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली ती शेवटपर्यंत राखली. सकाळी साडेदहा वाजता व्यापारी व आडते संघातील मतमोजणी पूर्ण झाली. सोसायटी व ग्रामपंचायत गटातही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. हमाल व तोलारी मतदार संघात विलास तुळशीराम गांजाळे व पवन प्रक्रिया संस्था मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १७ जागा जिंकून राष्ट्रवादीने बाजार समितीची सत्ता निर्विवाद राखली आहे. कृषी पतसंस्था सोसायटी गटात सर्वसाधारणमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे देवदत्त जयवंतराव निकम, सखाराम हरिभाऊ काळे, दत्तात्रय रामभाऊ तोत्रे, बाळासाहेब लक्ष्मण बाणखेले, दत्तात्रय शंकर हगवणे, गणपतराव सावळेराम इंदोरे, दत्तात्रय बाळकृष्ण वावरे, महिला प्रतिनिधी मयूरी मारुती शिंगाडे, जायदाबी नंदूभाई मुजावर, इतर मागास प्रवर्ग अशोक भिकाजी ठोके, अनुसूचित जमाती देवू पूनाजी कोकाटे हे विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिवाजीराव संपत निघोट, बाळासाहेब सावळेराम मेंगडे, अनुसूचित जाती-जमाती संजय महादेव शेळके, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्ञानेश्वर जनाजी घोडेकर हे विजयी झाले. व्यापारी व आडते संघातील बाळासाहेब रंगनाथ बाणखेले व सागर बाळशीराम थोरात यांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये राजाराम बाणखेले, माजी उपजिल्हाप्रमुख विजय पवार, वासुदेव भालेराव, गणपत भापकर, जितेंद्र माळुंजे यांचा समावेश आहे. सोसायटी सर्वसाधारण गटात देवदत्त निकम यांना सर्वाधिक ४३८ मते मिळाली आहेत, तर शिवसेनेकडून राजाराम बाणखेले यांना सर्वाधिक २३८ मते मिळाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. आर. माळी यांनी काम पाहिले. सहकार क्षेत्रात राष्टवादी काँगे्रस पक्षाने जनतेसाठी जे काम केले आहे त्या कामाप्रती विश्वास ठेऊन जनतेने विजय मिळवून दिला आहे. असेच काम या पुढेही करत राहू, शेतक-यांना अधिकाअधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करू. बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराच्यावेळी जो विकासाचा आराखडा मांडला होता, तो प्राधान्याने पूर्ण केला जाईल. दिलीप वळसे पाटील, आमदार आंबेगाव तालुका