शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जागावाटपावरून राष्ट्रवादीत दुफळी!

By admin | Updated: May 4, 2017 01:47 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २० मे रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये जागावाटपाच्या मुद्यावरून

शिरूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २० मे रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये जागावाटपाच्या मुद्यावरून दुफळी निर्माण झाली. आमदार दिलीप वळसे-पाटील व माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांच्या समन्वय बैठकीत ठरल्याप्रमाणे जागावाटप झाले नसून अ‍ॅड. पवार यांनी वळसे-पाटील यांना डावलून एन. टी. ओबीसीची जागा दुसऱ्यांना दिल्याचे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एका नेत्याने सांगितले.शिरूर तालुक्यातील ३९ गावे ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली आहेत. या ३९ गावांचा मिळून राष्ट्रवादीचा वेगळा पॅनेल टाकायचा. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वेळी माजी आमदार अ‍ॅड. पवार, पोपटराव गावडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी राष्ट्रवादीचा एकच पॅनेल असेल, असे स्पष्ट केले होते. आज उमेदवारांचे चिन्हवाटप होते. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला छत्री चिन्ह मिळाले. ३९ गावांतील पाच उमेदवार वगळता राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांनी वेळेत येऊन छत्री चिन्ह घेतले. मात्र प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर, शंकर जांभळकर, बाबाजी निचीत, कौत्सल्या भोर हे पाच जण वेळेत न आल्याने त्यांना दुसरे चिन्ह मिळाले.पाच जणांनी वेगळे चिन्ह स्वीकारले. इथेच राष्ट्रवादीतील दुफळीचा प्रत्यय आला. याबाबत माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले, की जागावाटपासंदर्भात अ‍ॅड. पवार यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. दिलीप वळसे-पाटील यांच्या शब्दालाही अ‍ॅड. पवार यांनी मान दिला नाही. हा वळसे-पाटील यांचा अपमान करण्याचा प्रकार आहे. यामुळे आमच्या ३९ गावांतील ५ उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विचार केला आहे. वळसे-पाटील यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. गावडे यांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादीतील मतभेद स्पष्ट झाले. माजी सभापती प्रकाश पवार यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. त्यांनी एन. टी. व ओबीसीच्या जागेवरून वाद निर्माण झाल्याचे उमेदवार बदलल्याचे कबूल केले. मात्र वळसे-पाटील यांच्याशी चर्चा केल्यावरच पुढील भूमिका ठरवू, असे स्पष्ट केले. आमचा (राष्ट्रवादीचा) एकच पॅनेल असेल, असे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अ‍ॅड. पवार यांच्या नेतृत्वाबाबत त्यांनी बोलायचे टाळले.एक महिन्यापूर्वी ‘लोकमत’ला प्रतिक्रिया देताना प्रकाश पवार यांनी राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व अ‍ॅड. पवार हेच करतील, असे स्पष्ट केले होते. आज मात्र ज्या पाच जणांनी अ‍ॅड. पवार यांच्या नेतृत्वावर अविश्वास व्यक्त केला. त्यात प्रकाश पवार यांचा समावेश आहे, हे विशेष (ही बाब ते नाकारत असले तरी) असेल, असे स्पष्ट असले तरी निर्माण झालेली दुफळी येत्या काही दिवसांत भरून निघेल हा प्रश्न आहे. ३९ गावांत गावडे व माजी सभापती पवार यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचा पॅनेल निवडून आणण्यात गावडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. राष्ट्रवादीतील दुफळीबाबत जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांना विचारले असता, त्यांनी तालुकाध्यक्षांकडून, नेत्यांकडून माहिती घेतो, असे उत्तर दिले. अ‍ॅड. पवार यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. दुफळी राष्ट्रवादीत पडली. याबाबत भाजपाची मंडळीच पत्रकारांना माहिती देत होती. भाजपाच्या तालुकाध्यक्षाने याबाबत पत्रकारांना फोन केले, हे विशेष. राष्ट्रवादीतील दुफळीचा भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे.