शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

जागावाटपावरून राष्ट्रवादीत दुफळी!

By admin | Updated: May 4, 2017 01:47 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २० मे रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये जागावाटपाच्या मुद्यावरून

शिरूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २० मे रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये जागावाटपाच्या मुद्यावरून दुफळी निर्माण झाली. आमदार दिलीप वळसे-पाटील व माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांच्या समन्वय बैठकीत ठरल्याप्रमाणे जागावाटप झाले नसून अ‍ॅड. पवार यांनी वळसे-पाटील यांना डावलून एन. टी. ओबीसीची जागा दुसऱ्यांना दिल्याचे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एका नेत्याने सांगितले.शिरूर तालुक्यातील ३९ गावे ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली आहेत. या ३९ गावांचा मिळून राष्ट्रवादीचा वेगळा पॅनेल टाकायचा. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वेळी माजी आमदार अ‍ॅड. पवार, पोपटराव गावडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी राष्ट्रवादीचा एकच पॅनेल असेल, असे स्पष्ट केले होते. आज उमेदवारांचे चिन्हवाटप होते. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला छत्री चिन्ह मिळाले. ३९ गावांतील पाच उमेदवार वगळता राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांनी वेळेत येऊन छत्री चिन्ह घेतले. मात्र प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर, शंकर जांभळकर, बाबाजी निचीत, कौत्सल्या भोर हे पाच जण वेळेत न आल्याने त्यांना दुसरे चिन्ह मिळाले.पाच जणांनी वेगळे चिन्ह स्वीकारले. इथेच राष्ट्रवादीतील दुफळीचा प्रत्यय आला. याबाबत माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले, की जागावाटपासंदर्भात अ‍ॅड. पवार यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. दिलीप वळसे-पाटील यांच्या शब्दालाही अ‍ॅड. पवार यांनी मान दिला नाही. हा वळसे-पाटील यांचा अपमान करण्याचा प्रकार आहे. यामुळे आमच्या ३९ गावांतील ५ उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विचार केला आहे. वळसे-पाटील यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. गावडे यांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादीतील मतभेद स्पष्ट झाले. माजी सभापती प्रकाश पवार यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. त्यांनी एन. टी. व ओबीसीच्या जागेवरून वाद निर्माण झाल्याचे उमेदवार बदलल्याचे कबूल केले. मात्र वळसे-पाटील यांच्याशी चर्चा केल्यावरच पुढील भूमिका ठरवू, असे स्पष्ट केले. आमचा (राष्ट्रवादीचा) एकच पॅनेल असेल, असे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अ‍ॅड. पवार यांच्या नेतृत्वाबाबत त्यांनी बोलायचे टाळले.एक महिन्यापूर्वी ‘लोकमत’ला प्रतिक्रिया देताना प्रकाश पवार यांनी राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व अ‍ॅड. पवार हेच करतील, असे स्पष्ट केले होते. आज मात्र ज्या पाच जणांनी अ‍ॅड. पवार यांच्या नेतृत्वावर अविश्वास व्यक्त केला. त्यात प्रकाश पवार यांचा समावेश आहे, हे विशेष (ही बाब ते नाकारत असले तरी) असेल, असे स्पष्ट असले तरी निर्माण झालेली दुफळी येत्या काही दिवसांत भरून निघेल हा प्रश्न आहे. ३९ गावांत गावडे व माजी सभापती पवार यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचा पॅनेल निवडून आणण्यात गावडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. राष्ट्रवादीतील दुफळीबाबत जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांना विचारले असता, त्यांनी तालुकाध्यक्षांकडून, नेत्यांकडून माहिती घेतो, असे उत्तर दिले. अ‍ॅड. पवार यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. दुफळी राष्ट्रवादीत पडली. याबाबत भाजपाची मंडळीच पत्रकारांना माहिती देत होती. भाजपाच्या तालुकाध्यक्षाने याबाबत पत्रकारांना फोन केले, हे विशेष. राष्ट्रवादीतील दुफळीचा भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे.