शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:12 IST

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या ४० ग्रामपंचायती व २ ...

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या ४० ग्रामपंचायती व २ संमिश्र वर्चस्व निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अखंड सुरू असलेल्या विकास कामावर तालुक्यातील तमाम जनतेचा विश्वास असल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमय इंदापूर तालुका झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

सर्वसामान्य जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचारसरणीतून इंदापूर तालुक्यामध्ये कामकाज सुरू आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून झोपडीतील माणसाचा विकास व न्याय देण्याची भूमिका सातत्याने असल्यामुळे, प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या विविध योजनेचा निधी पोहोचलेला असून विकास पोचला आहे. इंदापूर तालुक्यातील विरोधक हे जनतेची दिशाभूल करण्यासाठी, इतक्या ग्रामपंचायती आमच्या विचाराच्या आल्या. आशा चुकीच्या बातम्या पसरवू लागले आहेत. परंतु ज्या ६० ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, यामध्ये तब्बल ४० ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व झाले आहे. तर दोन ग्रामपंचायती संमिश्र आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या विकासासाठी कटिबद्ध असून गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, वीज या मूलभूत सुविधा प्रत्येक गावाला दिल्या जातील. त्यामुळे तालुक्यातील कोणताही नागरिक, विरोधकांच्या भूलथापांना कधीही फसत नाही, असाही विश्वास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचे सातत्याने लक्ष इंदापूर तालुक्यावर असल्यामुळे तालुका पुणे जिल्ह्यामध्ये विकास कामात पुढे राहिला आहे. दळणवळणासाठी महत्त्वाचे समजले जाणारे रस्ते अद्यावत होत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचा उपेक्षित असलेल्या पाणीप्रश्न मार्गी लागत आहे. पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून मिळणारे पाणी जास्तीचे मिळणार आहे, हा चाललेला विकासाचा महापूर विरोधकांना देखवत नाही, अशी टीका राज्यमंत्री भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.

मी कधीही खोटे बोलत नाही.जे बोलायचे ते विकास कामातून बोलून दाखवतो. मात्र विरोधकांना काहीच हातात काम नसल्यामुळे, खोटे बोलून दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न अक्षरश: नुकत्याच झालेल्या इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नागरिकांनी नाकारला आहे, अशीही टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.

(राज्यमंत्री दत्तात्रय भरणे