शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

By admin | Updated: February 24, 2017 02:32 IST

मुळशी पंचायत समितीच्या ६ पैकी ४ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीवर

पौड : मुळशी पंचायत समितीच्या ६ पैकी ४ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले, तर जि.प.गटात तीन पैकी १ जागा सेनेकडे, तर २ जागा राष्ट्रवादीकडे राहिल्या आहेत. कासार आंबोली येथील सैनिकी शाळेत सकाळी बरोबर १० वाजता एकूण २८ टेबलवर सर्व गट गणाची एकाचवेळी सुरूझालेली मतमोजणी बरोबर ११.३० वाजता संपली.२०१२ च्या निवडणुकीत पंचायत समितीत सहा पैकी ५ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार, तर १ जागा काँग्रेस पक्षाकडे होती व जि.प. ३ गटांपैकी २ जागा राष्ट्रवादी, तर १ जागा सेनेकडे होती. या वेळी शिवसेनेने पंचायत समितीत मुसंडी मारत १ जागा अधिक घेतली, तर जि.प.गटात १ जागा कायम ठेऊन आपला आलेख उंचावता ठेवला.पौड-कासार-आंबोली गटात अनुसूचित जमातीचा शिवसेनेचा सर्वांत तरुण उमेदवार असलेला सागर काटकर याने सुरवातीपासून आघाडी घेत आपल्या विजयाचा मार्ग सुकर केला. तर त्यापाठोपाठ बावधन -पिरंगुट गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार शारदा ननावरे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली, परंतु अंतिम निकालात राष्ट्रवादीच्या अंजली कांबळे यांनी २१० मतांची आघाडी घेत बाजी मारली.विशेष म्हणजे सुरवातीला शिवसेनेच्या शारदा ननावरे याच विजयी झाल्याचे सर्वत्र कळाले व बाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंतिम निकालात अंजली कांबळे यांना विजयी घोषित केल्याने या आकस्मिक निकालाने तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पिरंगुट गणात आजी-माजी सभापतींच्या सौभाग्यवतींच्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या राधिका कोंढरे यांनी विजयश्री संपादन केली. भाजपा, मनसे व अपक्षांना आपले खातेही खोलता आले नाही. (वार्ताहर) माण- हिंजवडी गटात राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर यांनी आपल्याबरोबर माण व हिंजवडी गणाच्या दोन्ही जागा खेचून आणत काँग्रेस व सेनेला धक्का दिला. या निकालाने मुळशीत मतदारांनी राष्ट्रवादीने मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना, तर सेनेने मागील वर्षभरात केलेल्या संघटनात्मक बांधणीला कौल दिल्याचे स्पष्ट झाले.मुळशीत मागील निवडणुकीत भाजपाचे तालुक्यात कोणतेही अस्तित्व नसताना या वेळी भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहिली, तर माण गट वगळता काँग्रेस सर्व ठिकाणी पिछाडीवर राहिली आहे. या वेळी सर्वच पक्षांनी उमेदवार देताना घातलेल्या गोंधळामुळे आपल्याला अपेक्षित उमेदवार न मिळाल्याने तालुक्यातील तीन गटांत १३२०, तर सहा गणांत १०२३ अशा एकूण २३४३ मतदारांनी नोटा बटणाचा वापर केला.विजयी झालेल्या उमेदवारांनी आपल्या गावी मिरवणुका काढून जल्लोष केला.