शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

एनसीसीच्या विद्यार्थ्यांना देणार भूकंपातील सुरक्षिततचे प्रशिक्षण

By admin | Updated: May 2, 2015 05:34 IST

देशाच्या कोणत्याही भागात भूकंप आला तर शाळांमधील मुलांचे जीव वाचविण्याची धुरा आता राष्ट्रीय छात्र सेवा (एनसीसी) विद्यार्थ्यांच्या खांद्यावर दिली जाणार आहे

पुणे : देशाच्या कोणत्याही भागात भूकंप आला तर शाळांमधील मुलांचे जीव वाचविण्याची धुरा आता राष्ट्रीय छात्र सेवा (एनसीसी) विद्यार्थ्यांच्या खांद्यावर दिली जाणार आहे. भूकंप आला तर त्या क्षणी सुरक्षिततेसाठी काय करावे, याचे प्रशिक्षण एनसीसीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर देशभरातील १४ लाख एनसीसी विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन तेथे भूकंप आल्यासंदर्भातील मॉकड्रिल करणार आहेत.नेपाळमध्ये नुकताच प्रलयकारी भूकंप आला. तो जेव्हा आला त्या वेळी विद्यार्थी शाळेत शिकत होते. भूकंपाच्या वेळी विद्यार्थ्यांना कुठे जावे, काय करावे, याची माहिती नसल्याने अनेक बालकांचा मृत्यू झाला. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतातील राज्यांनाही बसले होते. तेथे भूकंपामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये बालकांचाही समावेश आहे. याची दखल संरक्षण मंत्रालयाने घेतली आहे. त्यामुळे भूकंप आल्यानंतर नेमके काय करावे, याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे एनसीसीचे विद्यार्थी शाळांमध्ये असून, त्यांची संख्या मोठी असल्याने प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.