शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘नाझरे’ तहान भागविणार!, बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:22 IST

जेजुरी : पूर्व पुरंदर तालुक्यातील व बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणा-या नाझरे जलाशयात आता उपयुक्त ७० टक्के पाणीसाठा झाल्याने पुढील वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे

जेजुरी : पूर्व पुरंदर तालुक्यातील व बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणा-या नाझरे जलाशयात आता उपयुक्त ७० टक्के पाणीसाठा झाल्याने पुढील वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. एकूण ७८८ दशलक्ष घनफूट क्षमता असणा-या या जलाशयात आज ६१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असल्याची माहिती नाझरे प्रकल्प शाखाधिकारी एस. जी. चौलंग यांनी दिली.गेल्या महिनाभरात पुरंदर तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील लहानमोठे तलाव, पाझर तलाव, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने प्रशासनावर आलेला ताण कमी झाला आहे. शेतकरी वर्गातही परतीच्या पावसाने समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातील हजेरी लावलेल्या वरुणराजाने तोंड फिरवले होते. यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला होता. पश्चिम, दक्षिण पुरंदरचा पट्टा वगळता उर्वरित भागातील खरीप हंगाम वाया गेला होता. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकरीवगार्तून मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणीही होऊ लागली होती.मात्र, परतीच्या पावसाने चांगलेच समाधान निर्माण केले आहे. पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेला होता. यातूनही टिकून राहिलेल्या खरीप पिकांचे परतीच्या पावसाने नुकसान केले असले, तरीही रब्बी हंगामाची खात्री निर्माण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक खेड्यांतून गेल्या सात-आठ वर्षांपासून न वाहिलेले ओढेनाले भरून वाहू लागल्याने विहिरीतून ही पाणीसाठा निर्माण झाला आहे.>सुमारे १८० शेती सिंचन सोसायट्यांनाही पाणी मिळू शकणाररब्बी हंगामाच्या वर्षाकाठी आवर्तनापैकी एखादे-दुसरे आवर्तन मिळू शकेल, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. जलाशयावरील जेजुरी, जेजुरी औद्योगिक क्षेत्र, आयएसएमटी कंपनी, तसेच मोरगाव व १६ गावांची प्रादेशिक योजना, नाझरे व ५ गावे प्रादेशिक योजना, पारगाव, माळशिरस २३ गावांची योजना आदी ५० गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना वर्षभर पाणीपुरवठा करू शकणार आहेत. शिवाय, जलाशयावरील सुमारे १८० शेती सिंचन सोसायट्यांनाही पाणी मिळू शकणार असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.