शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
5
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
6
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
7
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
8
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
9
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
10
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
11
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
12
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
13
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
14
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
15
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
16
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
17
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
18
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
19
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
20
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’

‘नाझरे’ तहान भागविणार!, बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:22 IST

जेजुरी : पूर्व पुरंदर तालुक्यातील व बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणा-या नाझरे जलाशयात आता उपयुक्त ७० टक्के पाणीसाठा झाल्याने पुढील वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे

जेजुरी : पूर्व पुरंदर तालुक्यातील व बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणा-या नाझरे जलाशयात आता उपयुक्त ७० टक्के पाणीसाठा झाल्याने पुढील वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. एकूण ७८८ दशलक्ष घनफूट क्षमता असणा-या या जलाशयात आज ६१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असल्याची माहिती नाझरे प्रकल्प शाखाधिकारी एस. जी. चौलंग यांनी दिली.गेल्या महिनाभरात पुरंदर तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील लहानमोठे तलाव, पाझर तलाव, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने प्रशासनावर आलेला ताण कमी झाला आहे. शेतकरी वर्गातही परतीच्या पावसाने समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातील हजेरी लावलेल्या वरुणराजाने तोंड फिरवले होते. यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला होता. पश्चिम, दक्षिण पुरंदरचा पट्टा वगळता उर्वरित भागातील खरीप हंगाम वाया गेला होता. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकरीवगार्तून मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणीही होऊ लागली होती.मात्र, परतीच्या पावसाने चांगलेच समाधान निर्माण केले आहे. पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेला होता. यातूनही टिकून राहिलेल्या खरीप पिकांचे परतीच्या पावसाने नुकसान केले असले, तरीही रब्बी हंगामाची खात्री निर्माण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक खेड्यांतून गेल्या सात-आठ वर्षांपासून न वाहिलेले ओढेनाले भरून वाहू लागल्याने विहिरीतून ही पाणीसाठा निर्माण झाला आहे.>सुमारे १८० शेती सिंचन सोसायट्यांनाही पाणी मिळू शकणाररब्बी हंगामाच्या वर्षाकाठी आवर्तनापैकी एखादे-दुसरे आवर्तन मिळू शकेल, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. जलाशयावरील जेजुरी, जेजुरी औद्योगिक क्षेत्र, आयएसएमटी कंपनी, तसेच मोरगाव व १६ गावांची प्रादेशिक योजना, नाझरे व ५ गावे प्रादेशिक योजना, पारगाव, माळशिरस २३ गावांची योजना आदी ५० गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना वर्षभर पाणीपुरवठा करू शकणार आहेत. शिवाय, जलाशयावरील सुमारे १८० शेती सिंचन सोसायट्यांनाही पाणी मिळू शकणार असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.