शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

‘नाझरे’ तहान भागविणार!, बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:22 IST

जेजुरी : पूर्व पुरंदर तालुक्यातील व बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणा-या नाझरे जलाशयात आता उपयुक्त ७० टक्के पाणीसाठा झाल्याने पुढील वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे

जेजुरी : पूर्व पुरंदर तालुक्यातील व बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणा-या नाझरे जलाशयात आता उपयुक्त ७० टक्के पाणीसाठा झाल्याने पुढील वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. एकूण ७८८ दशलक्ष घनफूट क्षमता असणा-या या जलाशयात आज ६१५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला असल्याची माहिती नाझरे प्रकल्प शाखाधिकारी एस. जी. चौलंग यांनी दिली.गेल्या महिनाभरात पुरंदर तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील लहानमोठे तलाव, पाझर तलाव, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने प्रशासनावर आलेला ताण कमी झाला आहे. शेतकरी वर्गातही परतीच्या पावसाने समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातील हजेरी लावलेल्या वरुणराजाने तोंड फिरवले होते. यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला होता. पश्चिम, दक्षिण पुरंदरचा पट्टा वगळता उर्वरित भागातील खरीप हंगाम वाया गेला होता. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकरीवगार्तून मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणीही होऊ लागली होती.मात्र, परतीच्या पावसाने चांगलेच समाधान निर्माण केले आहे. पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेला होता. यातूनही टिकून राहिलेल्या खरीप पिकांचे परतीच्या पावसाने नुकसान केले असले, तरीही रब्बी हंगामाची खात्री निर्माण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक खेड्यांतून गेल्या सात-आठ वर्षांपासून न वाहिलेले ओढेनाले भरून वाहू लागल्याने विहिरीतून ही पाणीसाठा निर्माण झाला आहे.>सुमारे १८० शेती सिंचन सोसायट्यांनाही पाणी मिळू शकणाररब्बी हंगामाच्या वर्षाकाठी आवर्तनापैकी एखादे-दुसरे आवर्तन मिळू शकेल, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. जलाशयावरील जेजुरी, जेजुरी औद्योगिक क्षेत्र, आयएसएमटी कंपनी, तसेच मोरगाव व १६ गावांची प्रादेशिक योजना, नाझरे व ५ गावे प्रादेशिक योजना, पारगाव, माळशिरस २३ गावांची योजना आदी ५० गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना वर्षभर पाणीपुरवठा करू शकणार आहेत. शिवाय, जलाशयावरील सुमारे १८० शेती सिंचन सोसायट्यांनाही पाणी मिळू शकणार असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.